ठाकरे ब्रँड नाही बँड आहे, अशी टीका भाजपने केली होती. त्याला उत्तर देताना मनसे नेते संदीप देशपांडे म्हमाले, ठाकरे हा ब्रँड नाही विचार आहे. ब्रँड हा बेपारी लोक उभा करतात तर विचार हा संघर्षातून उभ्या झालेल्या चळवळीतून निर्माण होतो.पैसे ओतून ब्रँड तयार करता येतो पण चळवळ नाही.पैसे संपले की ब्रँड संपतो पण विचार नाही.तुमचा बेपारी ब्रँड संपणार पण आमचा मराठी ठाकरे विचार नाही.
अंजली दमानिया यांच्याकडून विरोधी पक्षांना टार्गेट केले जाते. मात्र, भाजपच्या बाबत त्या काही बोलत नाही, असा आरोप रोहित पवार, सुषमा अंधारे यांनी केला होता. त्यावर सध्या मी एका खूप मोठ्या विषयावर काम करत आहे. त्यामुळे मी विनंती करते की एक आठवडा थांबा. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मी देईन. पण सध्या माझ्याकडे वेळ खरच खूप कमी आहे.
हलगाममध्ये २७ निरपराध नागरिकांचा बळी घेणाऱ्या पाकसोबत क्रिकेट खेळण्यास भारतातील बहुतेक क्रिकेट प्रेमींचा विरोध असतानाही पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळण्याचा निर्णय #BCCI ने घेतला, पण कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच हेच पाकने आज दाखवून दिलं. त्यांचा मस्तवाल खेळाडू साहिबजादा फरहान याने एके-४७ प्रमाणे बॅट दाखवत ज्या खेळातून परस्परांप्रती विश्वासाची भावना निर्माण व्हावी त्याच खेळातून द्वेष आणि शत्रूत्त्वाची पेरणी केली. ही अत्यंत संतापजनक आणि आक्षेपार्ह बाब आहे. असं असेल तर आतातरी या वाकड्या शेपटाच्या देशासोबत खेळण्याबाबत बीसीसीआय ने पुनर्विचार करावा, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.
भारत पाकिस्तान मॅचमध्ये साहिबजादा फरहानने मैदानावर अर्धशतकानंतर बॅटीने गोळ्या चालवण्याची अॅक्शन करत आनंद व्यक्त केला. त्यानंतर संजय राऊत यांनी ट्विट करत त्यांनी
त्याने अर्धशतक गाठले आणि बॅटला जणू एके-४७ प्रमाणे पकडून चौकार-षटकारांची सरबत्ती केली! ही अॅक्शन करत बीसीसीआय आणि मोदी सरकारच्या चेहऱ्यावर थुंकले आहेत.
Sahibzada Farhan just proved on the field how Pakistani terrorists slaughtered 26 innocents in Pahalgam—gunning them down like it was nothing.
— Sanjay Raut (@rautsanjay61) September 21, 2025
Reached his fifty and gripped the bat like an AK-47, firing boundaries!
This spit in the face of BCCI & Modi govt is peak humiliation.… pic.twitter.com/ojOxocKJfU
सत्तेतला असो की विरोधातला –ॉ जो आजच्या संघर्षात सोबत असेल तोच आपला, असे विजय वडेट्टीवार म्हणाले.गोंदिया येथे झालेल्या भव्य ओबीसी मेळाव्यात २ सप्टेंबरचा काळा जीआर रद्द झालाच पाहिजे अशी भूमिका त्यांनी मांडली. माझा संघर्ष हा नेता होण्यासाठी नाही. मी लढतोय ते माझ्या ओबीसी समाजाच्या हक्क आणि अधिकारांच्या रक्षणासाठी. ही ओबीसी समाजाच्या अस्तित्वाची लढाई आहे, जी निकराने लढली पाहिजे, असे ते म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.