क्रिकेटपटू आणि मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर व कुटुंबियांनी मनसे अध्यक्ष राज राज ठाकरेंच्या गणपतीचे दर्शन घेतले.
नाशिकमध्ये गणेशोत्सव आणि आगामी सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर एक दिवसीय संत संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. नाशिकरोडच्या बालाजी मंदिरात या संमेलनाला सुरुवात झाली आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळा कामांचा आढावा यात घेणार आहे. बैठकीला अखिल भारतीय संत समितीचे राष्ट्रीय महामंत्री स्वामी जितेन्द्रनंद सरस्वती उपस्थित आहेत. नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमधील वेगवेगळ्या आखाड्यांचे साधू महंत देखील संत संमेलनाला उपस्थित आहेत.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर भाष्य केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांनी निशाणा साधला आहे.
मराठा समाजाच्या मागण्या नवीन नाहीत. यापूर्वी महायुती सरकारनं त्यांच्याशी चर्चा केली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी जरांगेंशी चर्चा सुद्धा केली आहे. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शब्दाला जागून मागण्या पूर्ण कराव्यात असे राऊत म्हणाले. मुंबई ही मराठी माणसांची आहे. ही मराठी माणसांची राजधानी आहे. जर मुंबईत कबुतरांसाठी आंदोलन होऊ शकते. त्याला सरकार परवानगी देते तर मग मराठा समाजाला मुंबईत आंदोलन करण्यासाठी सरकारने परवानगी द्यायला हवी, असे जरांगे म्हणाले.
'अजूनही तुमच्या हातातून वेळ गेली नाही. गोरगरिबांची मनं जिंकण्यांची मुख्यमंत्र्यांकडे योग्य संधी आहे. तुम्ही आमचे वैरी नाहीत, शत्रू नाहीत. फक्त आठमूठे भूमिका सोडून द्या.', असे म्हणत मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. जुन्नर येथून मुंबईकडे रवाना होताना जरांगे माध्यमांशी बोलत होते.
मराठा आंदोलक मनोज जरांगे शुक्रवारी मुंबईत येणार आहे. त्यांच्या स्वागतासाठी भाजपकडून खारघरमध्ये बॅनरबाजी करण्यात आली आहे. प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड, निरंजन डावखरे नरेंद्र पाटील यांनी हा बॅनर लावलेला आहे. मराठा समाजाला पहिल्यांदा आरक्षण देणारे उच्च न्यायालयात ते आरक्षण टिकवणारे नेतृत्व म्हणजे देवेंद्र फडवणीस, अशा प्रकारचा मजकूर बॅनरवर आहे.
मराठा आणि ओबीसी समाजांच्या आरक्षणासाठीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर धाराशिवमध्ये 9 सप्टेंबरपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. उपोषण, मोर्चे, आंदोलन, रस्ता रोको, सभा घेण्यास धाराशिवमध्ये बंदी घालण्यात आली आहे. अप्पर जिल्हा दंडाधिकारी शोभा जाधव यांच्याकडून मनाई आदेश जारी करण्यात आले आहेत.
ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण द्यावं या जुन्याच मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील 29 ऑगस्टपासून मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणाला सुरूवात करणार आहेत. यासाठी जरांगेसंह त्यांचे राज्यभरातील समर्थक मुंबईच्या दिशेने रवाना झालेत. तर जरांगे मुंबईत दाखल होण्याआधी भाजप नेत्यांकडून मुंबईत जोरदार बॅनरबाजीने करण्यात आली आहे. या बॅनरवर 'इतिहास शिव्यांना नव्हे तर इतिहास हा कर्तृत्ववाला लक्षात ठेवतो'; असं लिहिलं आहे. शिवाय मराठा समाजाला पहिल्यांदा आरक्षण देणारे देवेंद्र फडणवीसच होते, असाही उल्लेख बॅनवर करण्यात आला आहे.
पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टकडून दरवर्षी अथर्वशीर्ष पठण कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यंदाही ते करण्यात आलं होतं. यावेळी ॠषिपंचमीनिमित्त 35 हजार महिलांनी एकत्रित अर्थवशीर्ष पठण केलं.
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या हालचालीत वेग आला असतानाच आता राष्ट्रीय ओबीसी महासंघाने तातडीची बैठक बोलावली आहे. ही बैठकी ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी बोलावली असल्याची माहिती राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी दिली आहे.
संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त दिल्लीत आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी देशासह जगभरात सुरू असलेल्या विविध घडामोडींवर भाष्य केलं. सध्या जगभरात कट्टरता असहिष्णुता आणि अस्थिरता वाढत आहे. धर्म सर्वत्र पोहोचला पाहिजे. मात्र त्याचा अर्थ धर्मांतर करणे नव्हे, धर्म म्हणजे एक जीवनस्वभाव आहे. तर सामाजिक समरसतेवर बोलताना ते म्हणाले, "मंदिर, पाणी आणि स्मशान हे सर्वासाठी खुलं असावं, त्यामध्ये कोणताही भेदभाव असायला नको."
नागपूर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे यांची 23 लाखांनी फसवणूक झाल्याची माहिती समोर आली आहे. पेठे यांच्या खात्यातील परस्पर शेअर अन्य खात्यात ट्रान्सफर करून ही फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी नंदनवन पोलिसांनी नंदन ओमप्रकाश गोस्वामीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
मनोज जरांगे पाटील काल अंतरवाली सराटीहून मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. त्यानंतर रात्रीच्या मुक्कामानंतर ते आता शिवनेरीवर दाखल झाले आहेत. ओबीसीतूनच मराठा समाजाला आरक्षण द्या, या मागणीसाठी मनोज जरांगे आझाद मैदानावर आंदोलन करणार आहेत.
विरार इमारत दुर्घटनेत आतापर्यंत 17 जणांचा शोध लागला असून त्यापैकी 14 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. इतर गंभीर जखमी असल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मंगळवारी रात्री विरार पूर्वेच्या विजयनगर परिसरातील रमाबाई अपार्टमेंट या इमारतीचा काही भाग कोसळला होता. या इमारतीच्या ढिगाऱ्यात अनेक कुटुंब गाडली गेली. या कुटुंबांचे शोधकार्य एनडीआरफ पथक आणि वसई विरार महापालिका अग्निशमन दलाकडून सुरू आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.