Maharashtra Political Live Upadte : 2029 पर्यंत महाराष्ट्रातच राहणार, दिल्लीत जाण्याच्या चर्चा फडणवीसांनी फेटाळली

Sarkarnama Headlines Updates : 28 सप्टेंबर 2025 रोजीच्या देशासह राज्यातील दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची राजकीय नेत्यांकडून पाहणी, शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत, पुढील तीन दिवस जोरदार पावसाचा अंदाज, एकनाथ शिंदेंविरोधात भाजपचे माजी नगरसेवक नाराज, याबाबतच्या ताज्या अपडेट जाणून घेऊयात.
Maharashtra Political Live updates
Maharashtra Political Live updatesSarkarnama

पावसाचा जोर वाढणार, हवामान विभागाचा इशारा

भारतीय हवामान विभागाकडून २७ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०२५ या तीन दिवसांच्या दरम्यान राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची तीव्रता वाढण्याचा इशारा देण्यात आलेला आहे. त्यानुसार कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात व्यापक पाऊस तर काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसामुळे शहरी पुराच्या धोक्याची शक्यता असल्याचे नागरिकांनी सतर्क रहावे, असे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे.

मराठवाड्यातील पूरग्रस्तांच्या  केदार दिघेंकडून मोफत औषधांचा पुरवठा

पूर ग्रस्त भागातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आनंद दिघे यांचे पुतणे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी मोठा पुढाकार घेतला आहे. आनंद दिघे युवा प्रतिष्ठान व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मराठवाड्यातील पूरग्रस्त बांधवांसाठी मोफत औषध पुरवठा करण्यात येणार आहे. यासाठी औषधांनी भरलेला एक मोठा टेम्पो पुणे येथून पूरग्रस्त भागाकडे रवाना झाला आहे. यावेळी पक्षाचे उपनेते व पुणे जिल्हा संपर्क प्रमुख सचिन अहिर, पुणे जिल्हा प्रमुख उल्हासजी शेवाळे, राज्य संघटक वसंतजी मोरे, शहर प्रमुख संजयजी मोरे, युवासेना जिल्हाप्रमुख सागर मोडक, सुजित थेवरे, नितीन गावडे, प्रतिष्ठानचे अभिषेक जाधव, रोहन आंब्रे, संजय पाठक तसेच अन्य पदाधिकारी यांच्या उपस्थितीत हा टेम्पो रवाना झाला.

इंदापूर शहरात झालेल्या पावसामुळे बाधित भागाची कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून पाहणी

इंदापूर शहरात मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे इंद्रेश्वर मंदिर परिसरातील रस्त्यावर पाणी साचून नागरी वस्तीत पाणी शिरले होते, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी या नागरी वस्तीला भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला आणि प्रशासनाकडून संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेत आवश्यक त्या उपाययोजना तातडीने करण्याच्या सूचना दिल्या.

Devendra fadnavis : 2029 पर्यंत महाराष्ट्रातच राहणार, दिल्लीत जाण्याच्या चर्चा फडणवीसांनी फेटाळली

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भाजपचे अध्यक्षपद मिळेल, अशी शक्यता वर्तवली जात होती. लवकरच ते दिल्लीत जातील, असे देखील बोलले जात होते. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनीच माध्यमांना दिलेल्या मुलाखतीमध्ये आपण 2029 पर्यंत महाराष्ट्रातच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे 2029 ची विधानसभा निवडणूक देखील महायुती फडणवीसांच्या नेतृत्वाखाली लढेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे फडणवीस दिल्लीला जाणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com