मी राजकारणात, समाजकारणात येण्याच्या आधीपासूनच्या आठवणी आहेत. माझ्यासाठी अजितदादा म्हणजे राजकारणावर विश्वास बसावा याचं प्रमुख कारण होते. मी शिवस्वराज्य यात्रा काढली तेव्हा खूप व्यक्तिगत गोष्टी सांगणारे, अनुभव सांगणारे असे दादा मी पाहिलेत, अनुभवले आहेत. आमच्या पक्षाचे दोन भाग झाले तेव्हाही आमच्या चर्चा झाल्या होत्या. आज ते नसताना त्यांची उणीव जाणवतेय, अशा शब्दात कोल्हेंनी अजितदादांची आठवणी सांगितल्या आहेत.