Maharashtra Politics Live Update : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच एमआरआय मशीन वर्षभरापासून बंद

Maharashtra Breaking News Today LIVE Updates : आज शनिवार 28 फेब्रुवारीच्या दिवसभरातील राज्य आणि देशभरातील राजकीय आणि प्रशासकीय घडामोडी जाणून घेऊया.
Maharashtra Politics Live Update
Maharashtra Politics Live UpdateSarkarnama

Buldhana Update : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच एमआरआय मशीन वर्षभरापासून बंद

बुलढाणा जिल्ह्यातील सामान्य रुग्णालयात अत्याधुनिक एमआरआय मशीन मागील एक वर्षांपासून बंद अवस्थेत आहे. विशेष म्हणजे, हे मशीन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या जिल्ह्यातच उद्घाटनाच्या प्रतीक्षेत धूळ खात पडले आहे.कोट्यवधी रुपये खर्चून बसविण्यात आलेले एमआरआय मशीन उद्घाटनाअभावी सुरूच झालेले नाही. लवकरात लवकर एमआरआय सेवा सुरू करण्याची मागणी केल्या जात आहे.

Three Language Policy : सीबीएसईसाठी इयत्ता 6वी पासून लागू होणार त्रिभाषा सूत्र, इंग्रजी आता अनिवार्य नाही!

आगामी शैक्षणिक वर्षासाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून सीबीएसई बोर्डासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्र लागू करण्यात येणार आहे. ज्यामध्ये या तीन भाषांपैकी 2 भाषा भारतीय असणार आहेत तर, इंग्रजीचा परदेशी भाषांच्या गटात समावेश केला जाणार आहे. म्हणजेच इंग्रजी ही भाषा यापुढे अनिवार्य मानली जाणार नाही. ती निवडक भाषांपैकी एक मानली जाईल. विद्यार्थ्यांना इंग्रजी, फ्रेंच, जर्मन यासारख्या परदेशी भाषांमधून एक भाषा निवडावी लागणार आहे.

Sanjay Raut Update : अजित पवार यांच्या मृत्यूप्रकरणाच्या चौकशीसाठी गुन्हा दाखल झाला पाहिजे; संजय राऊत यांची प्रतिक्रिया

'रोहित पवार यांना त्यांचे काका, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूप्रकरणी संशय आहे. त्यामुळे ते गुन्हा दाखल करून चौकशीची मागणी करत आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी देखील अजितदादांच्या मृत्यूप्रकरणाची चौकशीसाठी गुन्हा दाखल करण्यासाठी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर दबाव आणला पाहिजे,' असे ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले.

Sanjay Raut : 'डीजीसीए-व्हीएसआर'च्या हा‍तमिळवणीतून अजितदादांचा मृत्यू झाला; संजय राऊत

'डीजीसीए-व्हीएसआर'च्या हा‍तमिळवणीतून अजितदादांचा मृत्यू झाला, असा खळबळजनक दावा ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला. या यंत्रणेची स्वतंत्र चौकशी झाल्यास सर्व भ्रष्टाचार बाहेर येईल. 'व्हीएसआर' हा एक क्रमांकाचा आरोप आहे, असे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.

BJP News : गडचिरोलीमधील भाजप पदाधिकारी मुक्तेश्वर काटवे यांचे अपघाती निधन

गडचिरोली भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळलेले आणि नगर परिषदेचे स्वच्छता व आरोग्य सभापती म्हणून दीड महिन्यापूर्वीच पदभार घेणारे मुक्तेश्वर काटवे यांचा शुक्रवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास अपघाती मृत्यू झाला. कारगिल चौक परिसरात डुक्कर आडवे आल्याने त्यांची दुचाकी अनियंत्रित होऊन ते रस्त्यावर कोसळले. डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांचा जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत्यू झाला.

मुक्तेश्वर काटवे यांचे निधन

भाजपचे गडचिरोली नगरपालिकेतील स्वच्छता आणि आरोग्य सभापती मुक्तेश्वर काटवे (56) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या दुचाकीला मोकाट डुक्कराने जोराची धडक दिली. या अपघातामध्ये ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान, त्यांचे निधन झाले.

राज्यसभेसाठी काँग्रेसमधून चार ते पाच जण इच्छुक - वडेट्टीवार

राज्यसभेसाठी महाविकास आघाडीत जोरदार रस्सीखेच सुरू आहेय. दरम्यान 'राज्यसभेसाठी काँग्रेसमधून 4-5 जण इच्छूक असल्याचे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. ते म्हणाले, इच्छुक असणे म्हणजे उमेदवार नाही. इच्छुकांच्या नावाला पक्षश्रेष्ठींना हिरवा झेंडा दाखवल्यानंतर उमेदवारी निश्चित होते.

पोर्शे प्रकरणात डाॅ.अजय तावरे यांना जामीन

पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणातील आरोपी ससूनचे माजी वैद्यकीय अधीक्षक डॉ अजय तावरेंना जामीन मंजूर झाला आहे. सुप्रीम कोर्टानं त्यांना जामीन मंजूर केला आहे.पोर्शे कार अपघात प्रकरणी 17 वर्षीय अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने बदलल्याच्या आरोपाखाली त्यांना अटक करण्यात आली होती.

शिखर बँक गैरव्यवहार आरोपांना पूर्णविराम; तपास बंद करण्यास न्यायालयाची मान्यता

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (शिखर बँक) गैरव्यवहार प्रकरण बंद करण्याची शिफारस करणारा आर्थिक गुन्हे शाखेनं (EOW) दाखल केलेला क्लोजर रिपोर्ट विशेष न्यायालयाने स्विकारला आहे. यामुळे महाराष्ट्राच्या विद्यमान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ७० हून अधिक जणांना दिलासा मिळाला आहे. या प्रकरणात कोणताही फौजदारी खटला तयार होत नसल्याचे विशेष न्यायालयाचे न्या. महेश जाधव यांनी शुक्रवारी अहवाल स्वीकारताना स्पष्ट केले.

लातूर जिल्हा परिषदेमध्ये भाजपचाच अध्यक्ष 

लातूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाची निवड 16 मार्चला होणार आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत 23 जागा जिंकत काँग्रेस झेडपीत सर्वात मोठा पक्ष ठरला. तर 18 जागांसह भाजपा दुसऱ्या क्रमांकावर आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 12 सदस्य निवडून आले आहेत. राज्यात भाजपा-राष्ट्रवादीची युती असल्यामुळे जिल्हा परिषदेत या दोन पक्षांची सत्ता येणार हे आता स्पष्ट झाले आहे. तर, राष्ट्रवादीच्या पाठींब्याने भाजपचा अध्यक्ष होणार आहे.

बंडखोर भाजप नगरसेवकांना प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची कारणे दाखवला नोटीस

भिवंडी महापालिकेत भाजपच्या नगरसेवकांनी बंडखोरी केली. त्यामुळे बंडखोर नारायण चौधरी हे काँग्रेसच्या मदतीने महापौर झाले आहेत तर काँग्रेसचा उपमहापौर झाला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सहा बंडखोर नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com