नाशिकच्या चांदवड इथल्या मुंबई-आग्रा महामार्गावर कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा विराट क्रांती महामोर्चा काढलाय. कांद्याला प्रति क्विंटल किमान 2 हजार रुपये भाव मिळावा, या प्रमुख मागणीसाठी शेतकरी रस्त्यावर उतरलेत. त्यांनी मुंबई-आग्रा महामार्ग रोखलाय. या मोर्चामध्ये ठाकरेसेनेचे नेते अंबादास दानवे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे सहभागी झालेत. मेलोडी चॉकलेट वाटत शेतकऱ्यांनी निषेध केला.