मुंबईकडे निघालेले मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण आज मागे घेतले. मात्र या प्रश्नावर शासनाकडून गांभीर्याने पाहिले जात नाही. त्यामुळे नाशिक जिल्ह्यात सर्वपक्षीय वज्रमूठ करण्यात आली आहे. या संदर्भात सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बुधवारी नाशिक रोडला झाली. यावेळी विविध पक्षांचे नेते आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. आरक्षणाच्या प्रश्नावर एकजूट करण्यासाठी जिल्हाभर प्रयत्न केले जाणार आहेत.