Manoj Jarange Patil News: मनोज जरांगे पाटील यांनी 15 फेब्रुवारीपासून साखळी उपोषण सुरू करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे अवघ्या दोन दिवसांत राज्यभर मराठा समाजाचे साखळी उपोषण सुरू होणार होते. मात्र, मनोज जरांगे पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेत साखळी उपोषणाला स्थगिती दिली. पुढील 10-15 दिवसांसाठी उपोषणाला स्थगिती दिल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.
जरांगे पाटील म्हणाले की, उपोषण केले त्यावेळी सरकारने दिलेल्या आश्वसनांची अंमलबजावणी होत नसल्याचे साखळी उपोषणाचा इशारा देण्यात आला होता. मात्र, सरकारने दिलेल्या आश्वसनांपैकी दोन आश्वसने पूर्ण केली आहेत. त्यामध्ये शिंदे समितीला मुदतवाढ दिली, गॅझेट लागू करू म्हणून उल्लेख केला आहे. त्यामुळे उपोषण 10 ते 15 दिवस पुढे ढकलले आहे.
सरकारकडून सगेसोयरेची अंमलबजावणी करण्यासाठी आणखी तीन महिन्यांचा वेळ लागणार असल्याच सांगण्यात आलंय, मुख्यमंत्र्यांकडून चार पैकी दोन मागण्या मान्य करण्या तयारी दर्शवली आहे त्यासाठी आम्ही त्यांचे कौतुक करतो. राहिलेल्या दोन मागण्यांची अंमलबजावणी सरकारने आठ दहा दिवसांत करावी, असे देखील मनोज जरांगे पाटील म्हणाले.
सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेतल्याचे मनोज जरांगे पाटील यांना समजले असता त्यांनी संताप व्यक्त केला. ते म्हणाले, मराठ्यांनी तुमच्यावर विश्वास टाकला. तुम्ही गद्दारांच्या यादीत जाऊन बसलात, हे दुःखदायक आहे. देशमुख कुटुंबीयांचे रक्त सुरेश धस शोषण करतील. मराठ्याच्या तोंडात माती टाकतील आणि त्यांच्या अन्नात घाण करील, असं आम्हाला कधीही वाटलं नव्हतं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.