Jaydatta Kshirsagar News : ...अन् तब्बल नऊ वर्षांनंतर जयदत्त क्षीरसागरांनी पुन्हा चढली पंडितांच्या 'शिवछत्र'ची पायरी!

Beed Political News : क्षीरसागर - पंडित यांची बीड जिल्ह्यात तीन पिढ्यांपासून एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक अशी ओळख आहे.
Jaydatta Kshirsagar -Amarsinha Pandit
Jaydatta Kshirsagar -Amarsinha Pandit Sarkarnama
Published on
Updated on

Beed News : बीड जिल्ह्याचं राजकारण मुंडे, क्षीरसागर,पंडित या बड्या घराण्यांभोवती फिरत आले आहे. या बड्या तीनही कुटुंबांचा दबदबा राहिला आहे. या तीनही घराणे एकमेकांचे पारंपरिक राजकीय विरोधक म्हणून ओळखले जातात. त्यात क्षीरसागर- पंडित कुटुंबातून विस्तवही जात नव्हता, असे राजकीय चित्र आजतागायत राहिले आहे.

पण मराठा आंदोलनाचा सगळ्यात जास्त फटका बीड जिल्ह्यातील नेत्यांना बसला. याच पेटलेल्या राजकारणाने बीडमधील या दोन्ही कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी असणाऱ्या क्षीरसागर आणि पंडित कुटुंबाना एकत्र आणले आहे.

Jaydatta Kshirsagar -Amarsinha Pandit
BJP News : ऐन निवडणुकीच्या प्रचारातच घात झाला,भाजप नेत्याची निर्घृण हत्या; हल्ल्याच्या घटनेने खळबळ

मनोज जरांगे पाटलांच्या बेमुदत उपोषणानंतर मराठा आंदोलन चांगलेच पेटले होते. राज्यासह बीडमध्ये मराठा आंदोलनाची धग जरा जास्तच पाहायला दिसून आली. यात माजलगावचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर, माजी आमदार जयदत्त क्षीरसागर यांच्या घराला आग लावण्यात आली. तसेच गाड्यांचेही नुकसान करण्यात आले.

यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते अमरसिंह पंडित (Amarsinha Pandit) यांचा शिवछत्र बंगलादेखील टार्गेटवर होता. पण तो वाचला. आंदोलन स्थगित केल्यानंतर आता सोळंके, क्षीरसागरांनी गंभीर आरोप केले आहे. याचवेळी मोठी घडामोड घडली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

क्षीरसागर - पंडित यांची बीड जिल्ह्यात तीन पिढ्यांपासून एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक अशी ओळख आहे. एकाच पक्षात राहून दोघांनी एकमेकांचे पराभव घडवून आणलेले आहेत. मात्र, शहरातील जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटनेने दोघे एकत्र आले आणि संवाद झाला. तब्बल नऊ वर्षांनी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर(Jaydatta Kshirsagar) यांनी पुन्हा पंडितांच्या शिवछत्रचा उंबरठा ओलांडला.

...तोपर्यंत आपणही ‘डोक्यावर टोपी’ घालणार नाही!

दिवंगत केशरबाई क्षीरसागर व जेष्ठ नेते माजी मंत्री शिवाजीराव पंडित समकालीन राजकारणी. दोघेही एकाच पक्षात असतानाही त्यांच्यात विळ्या - भोपळ्याचे सख्य असे. शिवाजीराव पंडित यांचा पुतणे बदामराव पंडित यांच्या हाताने पराभव घडविण्यात क्षीरसागरांनी सर्व शक्ती पणाला लावली. याचे उट्टे काढण्यासाठी दिवंगत केशरबाई क्षीरसागरांचा पराभव करत नाही, तोपर्यंत आपणही ‘डोक्यावर टोपी’ घालणार नाही, असा पण शिवाजीराव पंडित यांनी केला. स्वत: काँग्रेसमध्ये असतानाही त्यांनी भाजपच्या तत्कालीन लोकसभेच्या उमेदवार रजनी पाटील यांना बळ दिले आणि त्यांचा पराभव घडवूनच डोक्यावर टोपी चढविली.

Jaydatta Kshirsagar -Amarsinha Pandit
Maratha Reservation News : मराठा आरक्षणासाठी आणखी एक बलिदान, उपोषण सुरू असतानाच आले मरण...

...पण कोणाच्या बंगल्यात जाणार नाही!

दरम्यान, आताच्या पिढीतही क्षीरसागर - पंडित यांचे हे विळ्या - भोपळ्याचे सख्य सुरूच आहे. २०१२ मध्ये जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीवेळी जयदत्त क्षीरसागर पालकमंत्री असल्याने संदीप क्षीरसागर यांना उमेदवारी निश्चित मानली जात होती. त्यामुळे राष्ट्रवादीचे सर्व प्रमुख नेते व सर्व जिल्हा परिषद सदस्य क्षीरसागरांच्या नगर रोडवरील बंगल्यात होते.

मात्र, ‘बंगला आपल्यालाही आहे’ पक्षाने कोणालाही उमेदवारी दिली तरी ‘भवानी शप्पथ’ आपण त्यालाच मतदान टाकू, पण कोणाच्या बंगल्यात जाणार नाही, असे अमरसिंह पंडित म्हणाले होते. मात्र, याच टर्ममध्ये २०१४ मध्ये राष्ट्रवादीने विजयसिंह पंडित यांना जिल्हा परिषद अध्यक्षपदाची उमेदवारी दिली.(Beed Politics)

भाजप - राष्ट्रवादीची मते समान होऊनही ‘लक’मुळे विजयसिंह पंडित जिल्हा परिषद अध्यक्ष झाले. याच्या सेलिब्रेशनला क्षीरसागर- पंडितांच्या शिवछत्रवर आले होते. पुढेही या दोघांतील विस्तव जळतच आहे. पण, सोमवारी क्षीरसागरांच्या बंगल्यासह शहरातील अनेक ठिकाणी जाळपोळ व दगडफेकीच्या घटना घडल्या. हा जमाव पंडितांच्या 'शिवछत्र' समोरही आला होता.

Jaydatta Kshirsagar -Amarsinha Pandit
CM Eknath Shinde News : एल्विश यादव प्रकरणावर मुख्यमंत्री बोलले; अहंकारी वृत्तीने राज्य चालत नाही

मात्र, तेथे अनुचित प्रकार घडला नव्हता. परंतु, याच्या पाहणीच्या निमित्ताने जयदत्त क्षीरसागर शिवछत्रवर आले आणि त्यांनी माजी आमदार अमरसिंह पंडित, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्याशी संवाद साधला. अशा घटना सामाजिक अशांतता घडविण्यास कारणीभूत ठरत आहेत. आंदोलनाआड भलतेच चेहरे असल्याचे दोघांच्या बोलण्यातून आले.

(Edited By Deepak Kulkarni)

Jaydatta Kshirsagar -Amarsinha Pandit
Praveen Darekar : ''सत्तेत राहून मुख्यमंत्री बघेल यांनी खेळला सट्टेबाजीचा खेळ, अन् ...'' दरेकरांचा गंभीर आरोप!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com