Devendra Fadnavis : महाराष्ट्राच्या नेतृत्वाची संधी कोणामुळे? कोण कोणाला दत्तक घेणार; गहिनीनाथ गडावर CM फडणवीसांची 'मोठी' कबुली

Gahininath Gad Beed Narali Saptah Maharashtra CM Devendra Fadnavis Gopinath Munde : बीड जिल्ह्यातील गहिनीनाथ गडावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री पंकजा मुंडे आणि भाजप आमदार सुरेश धस यांनी धार्मिक कार्यक्रमाला हजेरी लावली.
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Gahinath Gad Beed event : बीडच्या घाटशीळ पारगाव इथं गहिनीनाथ गडाच्या 93व्या नारळी सप्ताहासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली.

लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची आठवण काढताना, त्यांच्याच आशीर्वादानं महाराष्ट्रात वेगवेगळ्या पदांवर काम करण्याची संधी मिळाली. यातूनच बीड जिल्ह्याशी देखील वेगळं नातं तयार झालं आणि गहिनीनाथ गडावर येण्याची सुरुवात झाल्याची कबुली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

बीड (BEED) जिल्ह्यात सुरू असलेल्या राजकीय गुन्हेगारीवर सूचक भाष्य करताना, वारंवार काही गोष्ट दाखवणाऱ्या मीडियाला देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी सुनावलं. भाजप मंत्री पंकजा मुंडे, आमदार सुरेश धस आणि आमदार नमिता मुंदडा यावेळी उपस्थित होते.

Devendra Fadnavis
Shiv Chhatrapati Sports Award : आई लोकांच्या घरी धुणी भांडी करायची; पठ्ठ्यानं जिद्दीनं 'शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारा'वर नाव कोरलं

बीड जिल्ह्यातील गहिनीनाथ गडावरील नारळी सप्ताहाला 93 वर्षांची परंपरा आहे. अनेक अडचणींचा सामना करणारा हा आमचा बीड जिल्हा, भक्तीचा रसामध्ये नाहून निघतो आहे, याचा आनंद देखील होत आहे. गहिनीनाथ गडाच्या विकास काम हाती घेण्यात आली असून, आणखी भरपूर काम त्याठिकाणी करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटले.

Devendra Fadnavis
Dhananjay Munde fashion show : मुंडेसाहेब फॅशन-शो का गेले? मंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले, 'ते हिरो दिसतात...'

मंत्री पंकजा मुंडे यांनी गहिनीनाथ गड दत्तक घ्यावा, या मागणीवर, फडणवीस यांनी गहिनीनाथ गड दत्तक घेण्याची माझी ऐपत आणि औकातही नाही. पण मी गडाला दत्तक घ्यायला तयार आहे, तुम्ही मला दत्तक घ्या आणि गडाची जबाबदारी निश्चितपणे पार पाडू, असे सांगितले.

बीड जिल्हा सातत्यानं दुष्काळाच्या छायेमध्ये आहे. मराठवाड्याला दुष्काळा बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केला आहे. हक्काचं कृष्णेचं पाणी, ते बीडमध्ये आणण्याचा निर्णय घेतला आरे. आज ते पाणी आष्टीमध्ये पोचत आहे. मात्र ते पाणी आष्टीपर्यंत पोचून चालणार नाही, ते पाणी संपूर्ण जिल्ह्याला मिळाले पाहिजे. मराठवाडा दुष्काळ मुक्त करण्यासाठी समुद्रात वाहून जाणार 53 टीएमसी पाणी गोदावरीत आणण्याचे काम सुरू आहे. 30 टीएमसी पाणी वळण बंदराच्या माध्यमातून प्राप्त होत आहे. तुमचे हक्काचं पाणी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम सरकार करून दाखवेल, असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com