Marathwada News : नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीनंतर सगळ्याच राजकीय पक्षांनी आमचेच सरपंच जास्त, आमच्याच ताब्यात सर्वाधिक ग्रामपंचायती असा दावा केला होता. राज्याचा विचार केला तर (Bjp) भाजपने आम्हीच नंबर वन आहोत, असे छातीठोकपणे सांगितले, तर महाविकास आघाडीनेही आमच्याच जास्त ग्रामपंचायती असे म्हणत सत्ताधाऱ्यांचे दावे खोडून काढले.
आता दावे-प्रतिदाव्यानंतर निवडून आलेल्या सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार करण्याची स्पर्धा शिंदे-फडणवीस सरकार आणि (Mahavikas Aghadi) महाविकास आघाडीमध्ये सुरू झाली आहे. निवडणूक निकालानंतर (Marathwada) मराठवाड्यात तर सत्काराला या आणि निधी घेवून जा, असे आमिषच सत्ताधारी पक्षाकडून दाखवले जात असल्याचे समोर आले होते.
राज्याचे रोहयो मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी आपल्या संपर्क कार्यालयात मतदारसंघातील नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता. त्यापाठोपाठ उद्या, (ता.२५) रोजी भाजपच्या वतीने जिल्ह्यातील सरंपच व सदस्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
दिवंगत पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती व सुशासन दिनानिमित्त या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड, सहकार मंत्री अतुल सावे, आमदार हरिभाऊ बागडे, प्रशांत बंब, प्रदेश सरचिटणीस संजय केणेकर यांच्या उपस्थितीत हा सत्कार सोहळा दुपारी साडेबारा वाजता पार पडणार आहे. शिंदे गट, भाजपकडून सत्कार होत असल्यामुळे आता ठाकरे गटाकडून नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा सत्कार कधी होणार याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.