Imtiaz Jalil : शिवसेना मराठी लोकांसाठी ढाल होती, मला त्यांच्याबद्दल सहानुभूती..

मराठी माणसांच्या हितासाठी शिवसेना कायम ढाल म्हणून उभी राहिली होती. मराठी माणसांमध्ये एकजूट निर्माण करण्यात त्यांचा मोठा वाटा होता हे नाकरून चालणार नाही. (Mp Imtiaz Jalil)
Mp Imtiaz Jalil-Uddhav Thackeray News, Aurangabad
Mp Imtiaz Jalil-Uddhav Thackeray News, AurangabadSarkarnama
Published on
Updated on

औरंगाबाद : शिवसेना राज्यातील मराठी लोकांची ढाल म्हणून सतत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी होती. पण भाजप आणि त्यांच्या दिल्लीतील नेत्यांनी मराठी माणसांची एकजूट तोडली, त्यांच्यात फूट पाडण्याचे पाप केले. त्यामुळे (Shivsena) शिवसेनेची दयनीय अवस्था झाली आहे, मला त्यांच्याबद्दल सहानुभूती असल्याचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांनी म्हटले आहे.

मी देखील मराठी आणि (Maharashtra) महाराष्ट्रात राहतो, त्यामुळे शिवसेनेची झालेली अवस्था आणि मराठी माणसांत पडलेली फूट पाहून दुःख होत असल्याचेही इम्तियाज जलील म्हणाले. राज्यातील घडामोडी, शिवसेनेत पडलेली फूट, पक्षाचे झालेले तुकडे यावर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी प्रसार माध्यमांकडे आपले मत व्यक्त केले.

नाम बदलने से दर्द तो होता है, असा चिमटा काढतांनाच सत्तेसाठी शिवसेना काॅंग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेली होती. मुस्लिमांना विरोध करत नेहमीच शिवसेनेने आपली राजकीय पोळी भाजून घेतली होती. असे असले तरी आज त्यांच्याबद्दल मला सहानुभूती असल्याचे ते म्हणाले.

सत्तेसाठी कुणाबरोबरही जाणारी शिवसेना उद्या आमच्याकडे आली तरी आम्ही त्यांच्यासोबत जाणार नाही, असेही इम्तियाज यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रात लाज आणणारे घाणेरडे राजकारण सुरू आहे. राज्याला अस्थिर करण्याचे आणि मराठी माणसांमध्ये फूट पाडण्याचे काम भाजपने केले आहे. यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पुढाकार घेतला.

विशेष म्हणजे जे आतापर्यंत कोणालाही जमले नव्हते ते शिवसेनेतून फूटून बाहेर पडलेल्या मराठी माणसांनीच केले हे अत्यंत दुर्दैवी आहे. शिवसेनेशी आमचे राजकीय मतभेद होते, आहेत. त्यांनी कायम मुस्लिमांना लक्ष करत आपले राजकारण केले.

Mp Imtiaz Jalil-Uddhav Thackeray News, Aurangabad
Maratha Reservation : सरकारने अंत न पाहता तोडगा काढावा ; नाहीतर मंत्रालयावर धडकू..

असे असले तरी राज्यातील मराठी माणसांच्या हितासाठी शिवसेना कायम ढाल म्हणून उभी राहिली होती. मराठी माणसांमध्ये एकजूट निर्माण करण्यात त्यांचा मोठा वाटा होता हे नाकरून चालणार नाही.

पण आता शिवसेनेत खूप बदल झाला आहे. ते सत्तेसाठी काॅंग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेले. त्यामुळे धार्मिक रंग देण्याचे, मंदिर-मशिदीचे राजकारण आता त्यांना करता येणार नाही, असा टोला देखील इम्तियाज जलील यांनी लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com