Jalna : दानवेंनी कोणते भजे खाऊन विधान केले?भाजपचे २५ आमदार आमच्या संपर्कात ...

महाविकास आघाडीत कोणाला घ्यायेचे, कुणाला नाही याचे अधिकार आमचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आहेत. ते जे ठरवतील तोच निर्णय अंतिम राहील. (Abdul Sattar)
Abdul Sattar-Raosaheb Danve
Abdul Sattar-Raosaheb DanveSarkarnama

जालना : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी महाविकास आघाडीचे २५ आमदार आमच्या संपर्कात आहे, असा दावा धुळवडीच्या दिवशी केला. (Jalna) याला शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) प्रत्युत्तर दिले आहे. धुळवडीच्या दिवशी दानवेंनी कुठले भजे खाल्ले त्यांनाच माहित, पण आमचे नाही, तर भाजपचे २५ आमदार आमच्या संपर्कात आहेत, ते पळू नये म्हणून दानवेंकडून (Raosaheb Danve) अशी दिशाभूल केल्याचा दावा सत्तार यांनी केला आहे.

राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे एमआयएमला काय म्हणाले, हा त्यांचा वैयक्तिक विचार किंवा मत असू शकते. महाविकास आघाडीत कोणाला घ्यायचे याचा निर्णय आमचे पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच घेतील आणि तो सर्वांना मान्य असेल, असेही सत्तार यांनी स्पष्ट केले. काल धुळवड झाली पण त्याचे रंग खरे तर आज उधळले जात आहेत.

भाजपचे नेते महाविकास आघाडीचे २५ आमदार फुटणार असा दावा, करत आहेत, तर शिवसेनेने भाजपचेच आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा केला आहे. यावरून दोन्ही पक्षात शिमगा सुरू असतांना शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दानवेंचा दावा खोटा असल्याचे म्हटले आहे.

प्रसार माध्यमांशी बोलतांना सत्तार म्हणाले, काल धुळवड होती, रावसाहेब दानवेंनी कशाचे भजे खाल्ले माहित नाही, त्याच्यामुळे ते महाविकास आघाडीचे २५ आमदार आमच्यासोबत असल्याचे सांगत आहेत. उलट राज्यातील महाविकास आघाडी सरकार भक्कम आहे, ते पडत नाही हे लक्षा आल्यावर भाजपचेच २५ आमदार आमच्या संपर्कात आहेत, तेच कधीही आमच्याकडे येऊ शकतात.

Abdul Sattar-Raosaheb Danve
शिवसेनेनं 'जनाब बाळासाहेब ठाकरे' स्वीकारलयं ; फडणवीसांनी डिवचलं

दानवेंना हे माहित आहे, म्हणूनच लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी राजेश टोपे यांच्यासोबत झालेल्या भेटीत महाविकास आघाडीत येण्याचा प्रस्ताव दिला आहे. पण महाविकास आघाडीत कोणाला घ्यायेचे, कुणाला नाही याचे अधिकार आमचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आहेत. ते जे ठरवतील तोच निर्णय अंतिम राहील.

टोपे यांनी जलील यांना काय आश्वासन दिले, हे मला माहित नाही. पण तो त्यांच्या वैयक्तिक विषय असेल, महाविकास आघाडी म्हणून टोपेंनी त्यांना काही शब्द दिला नसले, कारण या संदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार त्यांना नाही, तर उद्धव ठाकरे यांना आहे, असेही सत्तार म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com