शिवसेनेनं 'जनाब बाळासाहेब ठाकरे' स्वीकारलयं ; फडणवीसांनी डिवचलं

'कोणीही एकत्र आले तरी आता भाजपाला हरवू शकत नाही,'' असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
 Uddhav Thackeray, Sanjay Raut
Uddhav Thackeray, Sanjay Rautsarkarnama

नागपूर : एमआयएम (MIM)पक्षाने महाराष्ट्रात भाजपला (BJP) हरवण्यासाठी महाविकास आघाडीला युतीची ऑफर दिली आहे. यावरुन मोठ्या चर्चा सुरु असताना आणि भाजपकडून शिवसेनेवर टीका होत असतानाच शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी याबाबत मोठे विधान केले आहे. ते म्हणाले, ''महाराष्ट्रात तीन पक्षांचे सरकार आणि तीनच पक्षांचे राहिलं. यात चौथा, पाचवा याला काही अर्थ नाही,''

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले, ''एमआयएमने जरूर महाविकास आघाडी सोबत जावं. भाजपाविरुद्ध लढण्यासाठी, भाजपाला हरवण्यासाठी हे सगळं चालू आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. पण महाराष्ट्रातील जनता ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मागे आहे. आम्ही केलेली कामे आणि करत असलेली कामं जनता पाहत आहे,"

 Uddhav Thackeray, Sanjay Raut
काश्मीर फाईल्स नाही तर झुंड, पावनखिंडही टॅक्स फ्री करा : रा. स्व संघाची मागणी

''कोणीही एकत्र आले तरी आता भाजपाला हरवू शकत नाही,'' असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ''शिवसेनेने हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना विसरून जनाब बाळासाहेब ठाकरे यांना स्वीकारले आहे,'' असा टोला फडणवीसांनी लगावला. ''या सर्व प्रकरणात शिवसेनेची भूमिका काय असणार आहे याकडे विशेष लक्ष असेल,'' असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

औरंगाबादमध्ये एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील आणि राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यात एक बैठक झाली असून या बैठकीत इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीसोबत येण्याची ऑफर दिली असल्याची माहिती समोर आली. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

 Uddhav Thackeray, Sanjay Raut
नाना, तुम्ही पाटेकरच रहा, उगाच पटोले होऊ नका ; भातखळकरांचा टोला

''महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या विचारांवर आणि आदर्शांवर चालणारे पक्ष आहेत. अशात जर कोणत्या पक्षाचा नेता औरंजेबाच्या कबरीवर जावून डोक टेकत असेल आणि ते महाराष्ट्राचे आणि शिवसेनेचे आदर्श होणार नाहीत. त्यामुळे युती होणार असल्याच्या सर्व अफवा आहेत, असे स्पष्टीकरण खासदार संजय राऊत यांनी दिले.

राऊत म्हणाले, ''एमआयएम हे भाजपची बी टीमच आहेत. हे उत्तरप्रदेश आणि बंगालमध्ये आम्ही पाहिलं आहे, सिद्ध झालं आहे. त्यामुळे आमचे स्पष्ट मत आहे, ज्यांचे आदर्श औरंगजेब आहेत, मग ते कोणीही असतील ते महाराष्ट्राचे आणि शिवसेनेचे आदर्श होणार नाहीत. अशा पक्षांशी महाविकास आघाडीचा कोणताही संबंध येणार नाही, येवू शकत नाही. त्यांच्याशी आमची कोणतीही छुपी किंवा उघड युती होवूच शकत नाही. ज्यांच्याशी त्यांची छुपी युती आहे ती त्यांची त्यांना लखलाभ,''

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com