Manoj Jarange Patil PC : सरकारला आता सुट्टी नाही; मनोज जरांगेंनी मुख्यमंत्र्यांचं आवाहन धुडकावलं !

Manoj Jarange Patil PC : "मनोज जरांगे यांच्या प्रामाणिकपणावर आम्हाला विश्वास आहे..."
Eknath Shinde, Manoj Jarange Patil
Eknath Shinde, Manoj Jarange PatilSarkarnama
Published on
Updated on

Marathwada News : आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाजाच्या भावना तीव्र झाल्या आहेत. आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन पुकारणारे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज आठवा दिवस आहे. दरम्यान, राज्यात बिघडत चाललेल्या कायदा सुव्यवस्था आणि मराठा आरक्षणासंदर्भात आज सह्याद्री अतिथिगृहावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय बैठक पार पडली. या बैठकीत मराठा आरक्षण देण्याबाबत सर्वपक्षीयांचे एकमत झालेले आहे, तर मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेण्याबाबतही सर्वपक्षीयांनी आवाहन केले आहे. यावर आता जरांगेंनी आपली भूमिका स्पष्ट केली. (Latest Marathi News)

Eknath Shinde, Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil Uposhan : मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा आंदोलन उधळण्याचा डाव; जरांगे पाटलांचा गंभीर आरोप

जरांगे म्हणाले, "सरकारला वेळ आता कशासाठी पाहिजे? मराठ्यांना सरसकट आरक्षण देणार का? सर्वपक्षीय बैठकीचा तपशील घ्यायची माझी इ्च्छा नाही. गोरगरीब मराठ्यांकडे लक्ष द्यायचे सोडून, सरकार बैठका घेत आहे. मराठा समाजाच्या तरुणांच्या आत्महत्या घडत आहेत. तरुणांवर गुन्हे दाखल करायचं काम सरकार करतं. त्यामुळे सरकारला सुटी नाही. आरक्षण द्या, आणखी वेळ कशाला पाहिजे. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देणार का?" असा सवाल जरांगेंनी सर्वपक्षीयांना केला आहे.

एकनाथ शिंदेंचे आवाहन -

"मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वपक्षीय नेत्यांची विस्तृत बैठक झाली. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे ही सरकारचीच नव्हे तर सर्वांचीच भूमिका आहे. आजच्या बैठकीत, मराठा समजाला कायद्याच्या चौकटीत बसणारे आणि टिकणारे आरक्षण दिले पाहिजे, असा ठराव करण्यात आला. त्याचवेळी, इतर समाजावर अन्याय न करता मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे," अशीही भूमिका घेण्यात आली.

Eknath Shinde, Manoj Jarange Patil
Maratha Andolan : 'एक मराठा, लाख मराठा' घोषणा देत मुंबईत आमदार निवासाबाहेर वाहनांची तोडफोड; दोघे पोलिसांच्या ताब्यात

मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी आज (ता. १) सह्याद्री अतिथिगृहावर सर्वपक्षीय बैठक पार पडली. राज्य मंत्रिमंडळाची सर्वपक्षीय बैठक संपल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. या वेळी 'मनोज जरांगे यांच्या प्रामाणिकपणावर आम्हाला विश्वास आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारही प्रमाणिक प्रयत्न करत आहेत. सरकारच्या प्रामाणिकपणावर विश्वास ठेवून जरांगेंनी उपोषण मागे घ्यावे,' अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी या वेळी केली.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com