
मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडेंवर घराण्यात फूट पाडल्याचा गंभीर आरोप केला आहे.
जरांगे यांनी विचारले – “खऱ्या वारसाला हे कळत नाही का? मुंडे घराण्याची दरी धनंजयमुळेच वाढली.”
या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा मुंडे घराण्याचा वारस कोण या विषयावरून राजकारणात खळबळ उडाली आहे.
Marathwada Politics : बहीण बहीण म्हणून नुसतं गळ्यात हात घालून चालत नाही, त्यांनीही तुम्हाला आपलं समजलं पाहिजे. धनंजय मुंडे यांच्यामुळे आपल्या बापाला मान खाली घालून चालावं लागलं, हे खऱ्या वारसाला कळत नाही का? त्याच्यामुळेच घराण्यात दरी निर्माण झाली, अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी मुंडे घराण्याच्या राजकीय वारस वादावर रोखठोक भूमिका मांडली. पंकजा मुंडेच गोपीनाथ मुंडेंची खरी वारसदार आहे हे म्हणण्याची गरज नाही, असेही जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले.
बीडमध्ये ओबीसींच्या महाएल्गार सभेत मंत्री छगन भुजबळ यांनी भाषण केले आणि त्यात गोपीनाथ मुंडे यांचे खरे राजकीय वारस धनंजय मुंडे हेच आहेत, असे विधान केले. यावरून राज्याच्या राजकारणात वादंग निर्माण झाले आहे. पंकजा मुंडे, धनंजय मुंडे या बहीण भावाने या वादावर अद्याप भाष्य केलेले नाही. परंतु यावरून करूणा मुंडे, प्रकाश महाजन, मनोज जरांगे पाटील यांनी आपली मत मांडली आहेत. प्रकाश महाजन यांनी छगन भुजबळ करूणा मुंडे यांना फटकारले आहे.
तर आता मनोज जरांगे पाटील यांनी या वादावर भाष्य करतांना छगन भुजबळ बीडमध्ये येऊन मतभेद पसरवून गेले असे सांगत धनंजय मुंडे यांच्यामुळे मुंडे घराण्यात दरी पडल्याचा गंभीर आरोप केला. पंकजा मुंडे यांनाही जरांगे पाटील यांनी सूचक सल्ले दिले आहेत. मुंडे कुटूंबाला तुम्हाला हिणवायचं आहे का? वैचारिक मतभेद असू नयेत.
देशात ठसा उमटवणाऱ्या व्यक्तीबद्दल आपल्याला आत्मीयता असली पाहिजे. छगन भुजबळांनी संस्कारहीन वागू नये. रक्ताने हात भरलेले लोक भुजबळांनी जमा केलेले आहेत. भुजबळ बीडला आला आणि भेद पसरवून गेला. मुंडे कुटूंबाला तुम्हाला हिणवायचं आहे का? असा सवाल जरांगे यांनी केला. पंकजा मुंडे वारसदार नाही तर मग कोण? असा सवाल करतानाच मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडे यांना लक्ष्य केले.
तो मिळेल त्या संधीत त्या पोरीला चेंगरायचं बघतो, मुंडे घराण्यात दरी धनंजय मुंडेंनीच तयार केली आहे. आपल्या बापाला याच्यामुळे मान खाली घालून चालावं लागलं, हे खऱ्या वारसाला कळत नाही का? खरा वारसा त्याच्यासोबतच हिंडत फिरतो. मग आपल्या सारख्याने काय बोलावं? खऱ्या वारसाने असे लोक खड्यासारखे बाजूला करावेत.
पंकजा मुंडेच गोपीनाथ मुंडेंची खरी वारसदार आहे हे म्हणण्याची गरज नाही. पंकजा मुंडे वारसदार नाही तर मग वारसदार कोण? असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केला. नुसती बहीण-बहीण म्हणून गळ्यात हात टाकून होत नाही. त्यांनीही तुम्हाला आपलं समजायला हवं, असे म्हणत जरांगे यांनी पहिल्यादांच पंकजा मुंडे यांची बाजू घेतली.
1. प्रश्न: मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडेंबाबत काय विधान केलं?
उत्तर: जरांगे यांनी म्हटलं की, “धनंजय मुंडेमुळेच मुंडे घराण्यात दरी निर्माण झाली, आणि खऱ्या वारसाला हे कळत नाही का?”
2. प्रश्न: हा वाद कोणत्या संदर्भात सुरू झाला?
उत्तर: गोपीनाथ मुंडेंचा खरा राजकीय वारस कोण, या विषयावरून हा वाद पुन्हा पेटला आहे.
3. प्रश्न: मुंडे घराण्यातील प्रमुख नेते कोण आहेत?
उत्तर: धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे दोघे सध्या चर्चेत आहेत.
4. प्रश्न: या वक्तव्यावर धनंजय मुंडेंनी काही प्रतिक्रिया दिली का?
उत्तर: अद्याप धनंजय मुंडेंची अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही, मात्र समर्थकांनी जरांगे यांच्या विधानावर टीका केली आहे.
5. प्रश्न: या वादाचा राजकीय परिणाम काय होऊ शकतो?
उत्तर: हा वाद बीड आणि मराठवाड्यातील राजकीय समीकरणांवर थेट परिणाम करू शकतो, विशेषतः आगामी निवडणुकांमध्ये.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.