
Mumbai News : राज्याच्या राजकारणातील गुन्हेगारीवरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आक्रमक झाल्यात. राज्यातील 288 पैकी 118 आमदारांविरोधात खून, अत्याचार, असे वेगवेगळ्या कलमान्वये भंयकर गुन्हे दाखल आहेत. राज्याच्या राजकारणातील गुन्हेगारीकरणाविरोधात बीडमधून आंदोलनाला सुरवात करत असल्याची घोषणा सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी केली.
बीडमधील गुन्हेगारीविरोधात, धनंजय मुंडे राजीनामा देईपर्यंत आणि त्यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड याला अटक होईपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 'सत्य'शोधक आंदोलन करणार असल्याचा इशारा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी दिला.
बीडमधील (BEED) सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यातील राजकारण वाढत्या गुन्हेगारीवरून चांगलेच तापले आहेत. संतोष देशमुख यांच्या हत्येतील पसार आरोपांना अटक करण्यासाठी बीडमध्ये काल मोर्चा निघाला. या मोर्चात सहभागी न होता, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सत्यशोधक आंदोलनाची घोषणा केली आहे. त्या रोज सकाळी दहा ते दुपारी बारावाजेपर्यंत बीडमधील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उभ्या राहून, पुरावे गोळा करणार असल्याची घोषणा केली.
अंजली दमानिया (Anjali Damania) म्हणाल्या, "महाराष्ट्राच्या राजकारणाचे गुन्हेगारीकरण मोठ्या प्रमाणात सुरू आहे. 288 आमदारांपैकी 118 आमदारांविरोधात मर्डर, बलात्कार असे भयानक कोण आहेत. वाळू माफिया, खंडणी वसूल करणारा लोकांच्या जमिनीवर ताबा घेण्याचे सगळे प्रकार सर्रास सुरू आहेत. त्याबाबत अनेक व्हिडिओ आणि पुरावे माझ्याकडे आले आहेत". या सर्व प्रकारांविरोधात आवाज उठवण्यासाठी एक नवीन प्रकाराचे सत्यशोधक आंदोलन सुरू करणार असल्याचे अंजली दमानिया यांनी घोषणा केली.
जोपर्यंत धनंजय मुंडे यांचा राजीनामा देत नाहीत, अन् त्यांच्या निकटवर्तीय वाल्मिक कराड याला अटक होत नाही आणि पसार तीन आरोपींना अटक होत नाही, तोपर्यंत बीड सोडणार नाही. सत्यशोधक आंदोलनासाठी रोज सकाळी दहा ते दुपारी बारा वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बाहेर थांबणार असल्याची घोषणा अंजली दमानिया यांनी केली.
'बीड जिल्ह्यातील इतर राजकारणी ही गुन्हेगार आहेत. परंतु आंदोलनाची सुरवात धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड याच्यापासून करत आहोत. आतापर्यंत ज्या ज्या चौकशी झाल्या, त्यातून सत्य बाहेर आलेले नाही, म्हणून हा लढा सुरू आहे. 'एडीआर'चा रिपोर्ट आहे. 118 लोकांवर गंभीर गुन्हे आहेत', असा आरोप देखील अंजल दमानिया यांनी केला.
बीडमध्ये संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपींना अटक होण्यासाठी आणि न्याय मिळण्यासाठी काढण्यात आलेल्या मोर्चात, सहभागी न होण्याचे कारण अंजली दमानिया यांनी सांगितले. "आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार सुरेश धस आणि आमदार संदीप क्षीरसागर ही जी मंडळी मंचावर होती, ती देखील त्याच प्रवृतीचे आहेत. राजकारणाची पोळी भाजण्यासाठी हे व्यासपीठावर गेले होते. संतोष देशमुख यांच्या कुटुंबाशी यांचा काही देणे घेणे नाही. परंतु माझा लढा हा, मी गणपतीची शपथ घेऊन सांगते धनंजय मुंडेंचं एकट्याचा राजकारण संपवण्यासाठी नाहीये, तर बीडमधील गुन्हेगारी संपवण्यासाठी आहे", असे अंजली दमानिया यांनी सांगितले.
भाजप आमदार सुरेश धस यांनी कालच्या मोर्चात काही महिला कलाकरांचे नाव घेतले. त्यात अभिनेत्री प्राजक्त माळी यांचे देखील नाव घेतले. प्राजक्त माळी यांनी याबाबत महिला आयोगाकडे तक्रार केली असून, यासंदर्भात त्या लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार आहेत. यावर अंजली दमानिया यांनी भूमिका घेताना, मी प्राजक्ता माळीबरोबर आहे. त्यांना त्यांच्या लढाईत मदतीला उभी राहील. सुरेश धस यांच्यासह कुठल्याही आमदार आणि खासदारांनी महिला संदर्भात बोललं नाही पाहिजे, असेही अंजली दमानिया यांनी म्हटले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.