
Nagpur News : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी बीड आणि परभणी हत्येप्रकरणावरून महायुती सरकारवर हल्लाबोल केला.
"बीड आणि परभणीतील हत्याकांड पहिल्या पाच-दहा दिवसात लाच काढत आहे. बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येत वाल्मिक कऱ्हाड याला अटक का होत नाही? 'वाल्मिक कऱ्हाड खडा, तर तो सरकार से बडा', सरकारपेक्षा हा वाल्मिक कऱ्हाड मोठा आहे का? असे म्हणत, बीडमध्ये पुढील आठवड्यात मोठा मोर्चा काढणार असून, परभणीत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या घरी सर्व विरोधक जाणार आहोत", असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले.
विधिमंडळाच्या सभागृहात बीड (BEED) आणि परभणी जिल्ह्यातील हत्याकांडप्रकरणावर चर्चा झाली नसल्याने विरोधकांनी कामकाजावर बहिष्कार घातला. यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी विधिमंडळ परिसरातून बीड आणि परभणी घटनेवरून सरकारवर हल्लाबोल केला. सरकार पाशवी बहुमताचा माज दाखवत आहे. नियमबाह्य काम करत आहे, असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला.
जितेंद्र आव्हाड म्हणाले, "वाल्मिक कऱ्हाड फोनवरून धमकी देतो, त्याची चौकशी होत नाही. वाल्मिक कऱ्हाड आणि मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे संबंध तपासावेत. बीडमधील वाल्मिक कऱ्हाड कोण आहे? खंडणीत आरोपी होतो. पण खुनाच्या गुन्ह्यातील प्रमुख आरोपीच्या संपर्कात असताना, त्याला आरोपी का केले नाही? 'वाल्मिक कऱ्हाड खडा, तर तो सरकार से बडा', असे म्हणत चौकशी का होत नाही. सरकारपेक्षा हा वाल्मिक कऱ्हाड मोठा आहे का?"
"बीड आणि परभणी हत्याकांडप्रकरणात या सरकारची पहिल्या पाच-दहा दिवसांत लाच जातेय. परभणी आणि बीडमधील घटना वस्त्रहरण करत आहे. सरकारच्या पाशवी बहुमताचा माज दाखवू, असे नियमबाह्य काम करत आहेत. सभागृहात स्थगन मांडला. बोलू दिले जात नाही. आमच्या मनात येईल, तेव्हा बोलू, असे नसते. दोन गंभीर विषयावर महाराष्ट्र अस्वस्थ आहे. विधानसभेचा अधिवेशन सुरू आहे. त्याचे गांभीर्य नाही. महाराष्ट्राच्या सभागृहात बसण्यात अर्थ नाही. त्यामुळे आम्ही बहिष्कार घातला. पुढील आठवड्यात बीडमध्ये मोठा मोर्चा काढत आहोत. उद्या आम्ही सर्व विरोधक परभणीत जात आहोत", असे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.
कायदेशीर आयोगाकडून चौकशी करा
संतोष देशमुख यांच्या हत्येच्या चौकशीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी नेमण्याची घोषणा केली आहे. परंतु त्यावर देखील जितेंद्र आव्हाड यांनी फटकारले आहे. एसआयटी नेमून काहीच होणार नाही. या हत्येच्या तपासासाठी स्वतंत्र कायदेशीर आयोग नेमा, अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी केली.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा मंत्री धनंजय मुंडे यांनी सर्व आरोप फेटाळले आहे. अतिशय घाणेरड्या घटनेत विरोधक राजकारण करत आहेत. माझे आणि वाल्मिक कऱ्हाड यांच्याशी संबंध आहेत. म्हणजेच मी गुन्ह्यात आहे असे नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावर सभागृहात सविस्तर भूमिका मांडली आहे. गुन्हा दाखल आहे, असे त्यांनी सांगितल्याकडे मुंडे यांनी लक्ष वेधले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.