हिंगोली : गेल्या काही दिवसांपासून भाजप (BJP) आणि महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांमध्ये चांगलेच शाब्दिक युद्ध रंगले आहे. त्यात आता शिवसेना (Shivsena) आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांनी वंचित बहूजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्यावर टीका करून नव्या वादाला तोंड फोडले आहे. गेल्या निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांनी एक हजार कोटी रुपये घेतल्याचा गंभीर आरोप बांगर यांनी केला आहे. ते हिंगोलीत शिवसेनेच्या सरू असलेल्या शिवसंपर्क अभियाना दरम्यान जवळा बाजार येथे आयोजित मेळाव्यात बोलत होते.
एमआयएमच्या (MIM) महाविकास आघाडीच्या प्रस्तावावरून बांगरांनी आंबेडकरांवर टीका केली. वंचित ही भाजपची बी टीम असून आंबडेकर यांनी गेल्या निवडणुकीत एक हजार कोटी रुपये घेतले. तसेच, गेल्या निवडणुकीत प्रचारासाठी त्यांनी हेलिकॉप्टरने प्रवास करत सभा घेतल्या. कुठून हे हेलिकॉप्टर आले हे सुद्धा लोकांना सांगावे लागणार आहे. मात्र, आंबेडकरांनी पैसे कुणाकडून घेतले हे बांगर यांनी स्पष्ट केले नाही. बांगर म्हणाले, भाजपने मत विभाजित करण्यासाठी एमआयएमला पुढं केले. गेल्या निवडणुकीत आंबेडकरांच्या वंचितचाही त्यासाठीच वापर केला गेला. त्यासाठी एक हजार कोटी रुपये दिल्याचा गौप्यस्फोट बांगरांनी यावेळी केला.
आंबेडकर हे आपल्या बौद्ध समाजाला ताकद दाखवायची म्हणाले होते. ते कुणाच्या भरोशावर?, म्हणाले होते, असा सवालही बांगरांनी यावेळी उपस्थित केला. एमआयएमने महाविकास आघाडीत समाविष्ट होण्याचा प्रस्ताव दिला. त्यावर बांगर म्हणाले की, एमआयएम ही भाजपची बी टीम असून वंचितसुद्धा भाजपचीच टीम आहे. त्यामुळे एमआयएमला महाविकास आघाडीत सहभागी करून घेण्याचे कारण काय, असे मत बांगर यांनी स्पष्ट केले. आता बांगरांच्या आरोपावर आंबेडकर काय उत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.