औरंगाबाद : जिल्ह्यातील शिवसेना बंडखोरांच्या विरोधात संघटनेचे पदाधिकारी शांत का ? असा सवाल शिवसेना (Shivsena) नेते चंद्रकांत खैरे यांनी उपस्थितीत करत जिल्हाप्रमुख तथा आमदार अंबादास दानवे यांच्यावर अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला होता. (Aurangabad) त्यानंतर दानवे आक्रमक झाले असून त्यांनी आपल्या फेसबुक पेजवर एक पोस्ट करत बंडखोर आमदार संजय शिरसाट यांना ` तुमचे ईमान किताल विकले`, असा संतप्त सवाल केला आहे.
तुमच्या मतदारसंघात जो हजारो कोटींचा निधी आला, त्यातून जी विकासकामे झाली ती तुमची प्राॅपर्टी विकून किंवा रिक्षा चालवून मिळालेल्या पैशातून झाला का? असा घणाघात देखील दानवे यांनी केला आहे. (Marathwada) एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडात जिल्ह्यातील सात पैकी पाच आमदार सहभागी झाले आहेत. भुमरे, शिरसाट, बोरनारे, जैस्वाल, सत्तार यांचा यात समावेश आहे. शिंदेच्या बंडात आमदार संजय शिरसाट यांचा महत्वाचा वाटा असल्याचे बोलले जाते.
या बंडानंतरच शिरसाट यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उद्देशून एक पत्र व व्हिडिओ जारी करत आगपाखड केली होती. त्यानंतर देखील मतदारसंघात किंवा शहरात शिरसाट यांच्या विरोधात फारसे आंदोलन झाले नाही. काल झालेल्या पत्रकार परिषदेत नेमकी यावरूनच खडाजंगी झाली. खैरै यांनी मी नेता आहे, संघटनेचे पदाधिकारी काय करतात ? असा सवाल केला होता.
त्यानंतर आज जिल्ह्यात व बंडखोर आमदारांच्या मतदारसंघामध्ये संपर्कनेते व स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ता मेळावे घेत आहेत. या पार्श्वभूमीवर अंबादास दानवे यांनी काहीवेळा पुर्वी आपल्या फेसबुकवरून केलेली पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. दानवे यांनी या पोस्टच्या माध्यमातून संजय शिरसाट यांना काही प्रश्न उपस्थितीत करत त्यांनी केलेल्या आरोपांची चीरफाड केली आहे.
दानवे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, पोस्ट टाकायला थोडा उशिरच झाला तरीही, संजय शिरसाठ यांनी पहिले सांगावे तुमचा ईमान कितीला विकला गेला. अगदी मुख्यमंत्री, पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांची भेट नाही होत, निधी नाही मिळाला असा आरोप केलाय. माझ्या सोबत स्वतः मुख्यमंत्रीसाहेबांची आपण मागच्या काही दिवसात आपल्या मतदार संघाच्या कामासंदर्भात भेट घेतली. बंडखोरी केल्यानंतर सोशल मिडिया हैडलवर मुख्यमंत्री साहेब सोबतचे फोटो डिलेट करु शकता, कमेंट सेक्शन बंद करु शकतात.
पण संभाजीनगरला आल्यावर शिवसैनिकांना सामोरे नाही जाऊ शकत. या प्रश्नांची उत्तर तूम्हाला देता येईल का? तूमच्या कार्यालयाचा उद्धघाटन कोणी केले? मागच्या काही दिवसापूर्वी मंत्रालय येथे झालेली पाणीपुरवठा बैठकीला तुम्हीं होता का नाही?, वर्षा निवासस्थानी स्नेहभोजनाला होता का नाही? आणि सर्वात महत्वाच जो हज़ारों कोटी विकास निधी तूमच्या मतदारसंघात मागच्या अड़ीच वर्षात दिला गेलाय तो तुमची प्रॉपर्टी विकून किंवा रिक्षा चालवून आलेल्या पैशातून केलाय का? असा सवाल देखील दानवे यांनी केला आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.