Sanjay Shirsat : ज्यांनी कधी हातात भगवा घेतला नाही, ते राऊत आम्हाला शिकवतायेत..

मुख्यमंत्री शिवसेनेचा असतांना कामे मात्र राष्ट्रवादी आणि काॅंग्रेसच्या लोकांची व्हायची, हे मी या आधी देखील बोललो आहे. या घुसमटीतून बाहेर पडण्याचा हाच एक मार्ग होता आणि तो आम्ही स्वीकारला. (Shivsena)
Mla Sanjay Shirsat-Sanjay Raut
Mla Sanjay Shirsat-Sanjay RautSarkarnama

औरंगाबाद : ज्यांनी कधी शिवसेनेचा भगवा झेंडा हातात घेतला नाही, कधी मोठ्या मोर्चात, आंदोलनात सहभा नव्हता असे संजय राऊत (Sanjay Raut) रोज उठून पत्रकार परिषद घेतात आणि आमच्यावर टीका करतात. खालच्या पातळीवर जाऊन बोलण्याचा त्यांना काय अधिकार आहे ? असा संतप्त सवाल आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी केला. `सरकारनामा`, शी बोलतांना शिरसाट यांनी विश्वासदर्शक ठराव आणि पुकारलेल्या बंडा संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली.

संजय राऊत म्हणाले, आमच्याबद्दल जनतेमध्ये विष पेरण्याचं काम केलं गेलं. आम्ही ओरडून ओरडून सांगत होतो, कामे होत नाहीत, मतदारसंघातली जनतेला काय उत्तर द्यायचे, पण आमचे कोणी ऐकूनच घेत नव्हतं. (Aurangabad) उद्धव ठाकरेंना अनेकदा सांगण्याचा प्रयत्न केला, पण तेही काही ऐकत नव्हते. ही सगळ्याच आमदारांची परिस्थिती होती.

मुख्यमंत्री शिवसेनेचा असतांना कामे मात्र राष्ट्रवादी आणि काॅंग्रेसच्या लोकांची व्हायची, हे मी या आधी देखील बोललो आहे. या घुसमटीतून बाहेर पडण्याचा हाच एक मार्ग होता आणि तो आम्ही स्वीकारला. आधी ऐकून घ्यायचे नाही आणि आता मार्ग निघाला असता, चर्चा झाली असती असे म्हणायचे हे कुठे तरी चुकीचे आहे. आमच्यासाठी जी भाषा संजय राऊत यांनी वापरली ती अत्यंत चुकीची होती. आमच्यासोबत महिला आमदार असतांना त्यांनी त्याचा देखील विचार न करता आमची तुलना वेश्याशी केली.

Mla Sanjay Shirsat-Sanjay Raut
Aurangabad : पन्नास कोटी घेणारे नाही, तर देण्याची ताकद असलेले आमदार आमच्यासोबत..

३०-३५ वर्ष लढून, अंगावर केसेस घेऊन आम्ही शिवसेनेत वावरलो, पक्षाला बळकटी दिली. पण ज्यांनी कधी शिवसेनेचा भगवा हातात घेतला नाही, रस्त्यावर उतरून आंदोलन केले नाही, असे लोक आज आम्हाला शिकवतायेत. आमच्याबद्दल जे चुकीचं सांगितलं गेलं, बदनामी केली गेली, त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहातील भाषणाने सडेतोड उत्तर दिले आहे. हे बंड नाही तर बाळासाहेबांची शिवसेना वाचवण्यासाठीचा उठाव होता.

अडीच वर्षात सर्वसामान्यांची व मतदारसंघातील कामे करणे हेच आमचे ध्येय असणार आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेना व अपक्ष मिळून ५० आमदार भाजपसोबत गेल्यामुळे आमच्या वाट्याला १४ ते १५ मंत्रीपद येतील, अशी अपेक्षा देखील शिरसाट यांनी व्यक्त केली. मंत्रींडळात कोणाला स्थान मिळेल, हे मात्र अद्याप सागंता येत नाही. आपण लवकरच मतदारसंघात येणार असून जनतेशी संवाद साधणार असल्याचेही शिरसाट यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com