Devendra Fadnavis : मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत फडणवीसांनी मंत्र्यांना दिला 'हा' इशारा; शिंदे, अजितदादांचंही ठरलंय... 

Assembly Session Mahayuti Government Cabinet Expansion : मंत्रिमंडळ विस्तारानंतर काही वेळातच नव्या मंत्रिमंडळाची पहिली बैठक झाली.
Devendra Fadnavis, Ajit Pawar, Eknath Shinde
Devendra Fadnavis, Ajit Pawar, Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Nagpur : मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर झालेल्या पहिल्याच बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी सर्व मंत्र्यांना सुचक इशारा दिला आहे. प्रत्येक मंत्र्यांच्या कामाचे मुल्यमापन केले जाणार असल्याचे फडणवीसांनी जाहीर केले आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत आम्ही तिघांनीही हे मंत्र्यांना सांगितले असल्याचे फडणवीस म्हणाले.

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला पूर्वसंध्येला महायुती सरकारची पत्रकार परिषद झाली. यावेळी फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे आणि इतर काही मंत्री उपस्थित होते. आजपासून आम्ही आमचा गतीशील कारभार सुरू केला आहे. येत्या दोन दिवसांत खातेवाटप पूर्ण केले जाईल. सर्व स्पष्टता आलेली आहे, असे फडणवीसांनी सांगितले.

Devendra Fadnavis, Ajit Pawar, Eknath Shinde
Cabinet Expansion : मंत्रिमंडळाचे खातेवाटप कधी होणार? अजितदादांनी स्पष्टच सांगितले

मंत्र्यांना अडीच वर्षांचाच कार्यकाळ असेल, असे अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी सांगितले होते. त्यावर बोलताना फडणवीस म्हणाले, प्रत्येक मंत्र्यांचे परफॉर्मन्स ऑडिट करू. चांगले काम न करणाऱ्या मंत्र्यांचा पुनर्विचार केला जाईल. आम्ही तिघांनीही मंत्रिमंडळ बैठकीत सगळ्या मंत्र्यांना सांगितले आहे की, सर्व मंत्र्यांच्या कामाचे मुल्यमापन केले जाईल.

मंत्रिमंडळ विस्तारावर बोलताना फडणवीस म्हणाले, नवे, जुने सर्व चेहरे दिसले पाहिजे, अशी भूमिका होती. महिलांसह विविध समाजाला चांगली संधी दिली आहे. काही जुने, नवीन चेहरे आहे. सर्वसमावेशक मंत्रिमंडळ तयार करण्यात आले आहे. काही मंत्र्यांना पक्षाने वेगळी जबाबदारी देण्याचे ठरवले आहे. त्यामुळे त्यांना संधी दिली नाही. काहींच्या परफॉर्मन्समुळेही त्यांना मंत्रिपद मिळाले नसेल, असेही असू शकते.

Devendra Fadnavis, Ajit Pawar, Eknath Shinde
Western Maharashtra : महायुतीच्या मंत्रिमंडळावर पश्चिम महाराष्ट्राचे वर्चस्व; उपमुख्यमंत्र्यांसह दहा मंत्रिपदे!

जवळपास वीस बिले या अधिवेशनात येणार असल्याची माहितीही फडणवीसांनी दिली. मागील काळात निवडणुकीपूर्वी निघालेले अध्यादेश बिलांमध्ये रुपांतरित होणार आहेत. चांगले कामकाज करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे फडणवीसांनी सांगितले. विरोधकांनी दिलेले पत्र मागच्या अधिवेशनातील असून त्यामध्ये फक्त ईव्हीएमचा मजकूर टाकण्यात आला आहे. त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांची उत्तरे आम्ही वारंवार दिली आहेत. महाराष्ट्रात एक गतीशील सरकार आणण्याचा आमचा प्रयत्न आहे, असल्याचेही ते म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com