Vijay Wadettiwar : वडेट्टीवार हे हिंदूद्वेषी, पण आता हिंदुत्ववादी सरकार आलयं; फडणवीसांच्या मंत्र्याची उद्धव ठाकरेंवरही घणाघाती टीका

Nitesh Rane On Uddhav Thackeray : मुंबईतला मराठी माणूस मुंबई बाहेर फेकण्यात सिंहाचा वाटा कुणाचा असेल तर ठाकरेंचा अशी वारंवार टीका होत असते. याआधी अशी टीका सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेकदा केली होती.
Uddhav Thackeray And Vijay Wadettiwar
Uddhav Thackeray And Vijay WadettiwarSarkarnama
Published on
Updated on

Sindhudurg News : मुंबईतला मराठी माणूस मुंबई बाहेर फेकला गेला. याला शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेच जबाबदार असल्याची टीका अनेकदा करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील अनेकदा मुंबईतील मराठी माणसाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यांनी, ठाकरे यांनी, मराठी माणसाच्या नावावर स्वतःची राजकिय पोळी भाजून घेतली. पण कधीच मराठी माणूस मुंबईत रहावा म्हणून कणभर प्रयत्न केले नाहीत, असा दावा केला होता. यानंतर आता असाच दावा पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंच्याबाबतीत करताना जोरदार टीका केली आहे.

देवगड शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माजी आमदार अ‍ॅड.अजित गोगटे, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी उपस्थित होते. यावेळी नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंसह विजय वडेट्टीवार यांच्यांवर निशाना साधला.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

नितेश राणे यांनी, मुंबईतील मराठी टक्का घसरण्याला मातोश्रीचे प्रमुख उद्धव ठाकरे हेच जबाबदार असल्याचे म्हटलं आहे. तसेच नितेश राणे यांनी यांवेळी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी जगद्‌गुरू नरेंद्राचार्य महाराज यांच्या एकेरी केलेल्या उल्लेखाचा समाचार घेतला. जगद्‌गुरू नरेंद्राचार्य महाराज यांचा एकेरी उल्लेख करणारे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार हे हिंदूद्वेषी असल्याची टीका त्यांनी केली आहे.

Uddhav Thackeray And Vijay Wadettiwar
Bhaskar Jadhav vs Nitesh Rane : भास्कर जाधवांना नितेश राणेंनी डिवचले; म्हणाले, 'केवळ सतरंज्या उचलायचे काम...'

महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर साधुसंतांना तुरुंगात टाकण्याचा कार्यक्रम सुरू होता; पण आता हिंदुत्ववादी सरकार राज्यात आले आहे. सरकार हिंदुंच्या मागे ठाम उभे असल्यानेच आता यांचे मनसुबे धुळीस मिळाल्याची टीका देखील नितेश राणे यांनी केली आहे.

जागतिक दर्जाचे धर्मगुरू असलेल्या जगद्‌गुरू नरेंद्र महाराज यांच्यावर एकेरी उल्लेख करणारे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार हे हिंदूद्वेषी आहेत. नरेंद्र महाराज यांचा एकेरी उल्लेख केला याबाबत उबाठाची भूमिका काय? उद्धव ठाकरे आताही गप्प का? असा सवाल यावेळी नितेश राणे यांनी विचारला आहे.

Uddhav Thackeray And Vijay Wadettiwar
Nitesh Rane : "शेवटची संधी, नाहीतर बसा बोंबलत; निधी देणारच नाही"

वडेट्टीवार जर मुस्लिमांबद्दल बोलले असते तर मातोश्रीला मिरच्या झोंबल्या असत्या. निलमताई गोऱ्हे बोलल्या ते सत्यच असून त्या बोलल्या त्या मातोश्रीच्या वहिनींना झोंबल्या. उबाठावाल्यांनी खुल्या व्यासपीठावर येवून बोलावे, असे आव्हान नितेश राणे यांनी दिले आहे.

मविआचे सरकार दलालीमधून आले

आता राज्यात हिंदुत्ववादी सरकार आले असून जिहाद्यांची आमच्या गोमातेकडे वाकड्या नजरेने पाहायची हिंमत होणार नाही. तर काँग्रेस आणि उबाठा पक्षच राहिलेली नाही. यामुळे पक्ष वाचविण्यासाठी कितीही यात्रा काढा त्यांचीच जत्रा होईल. यात्रेत सहभागी होण्यासाठी कार्यकर्तेही शिल्लक नाहीत. आता सक्षम कार्यकर्ते महायुतीमध्ये सामील होत आहेत. महायुतीचे सरकार हे पारदर्शी सरकार असून महाविकास आघाडीचे सरकार दलालीमधून आले होते, असा आरोप यावेळी नितेश राणे यांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com