Ashadhi Palkhi Wari : पालखी मार्गावरील तीन जिल्ह्यांतील ग्रामपंचायतींना मोठा दिलासा; आषाढी वारीपूर्वी अनुदान देणार : गोरेंची घोषणा

Jaykumar Gore Statement : संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावरील पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना राज्य सरकारकडून मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे.
Jaykumar Gore
Jaykumar GoreSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 17 May : संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावरील पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना राज्य सरकारकडून मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे. आषाढी पालखी सोहळ्यापूर्वी या ग्रामपंचायतीने अनुदान देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे मागील थकीत 25 टक्के आणि यंदाचे अनुदान पालखीसोहळ्यापूर्वी संबंधित ग्रामपंचायतींना मिळेल, अशी माहिती पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.

संत ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराजांची पालखी ही आषाढी वारीसाठी (Ashadhi Wari) येणाऱ्या वारकऱ्यांना सोयी सुविधा देण्यासाठी मार्गावरील ग्रामपंचायतींना राज्य सरकारकडून अनुदान दिले जाते. त्या मदतीच्या माध्यमातून संबंधित ग्रामपंचायती ह्या वारकऱ्यांना सोयी सुविधा उपलब्ध करून देतात. त्या अनुदानाचे वाटप या वेळी वेळेत होईल, असेही पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी स्पष्ट केले.

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) म्हणाले, पालखी मार्गावरील ग्रामपंचायतींचे मागील वर्षीचे 75 टक्के अनुदान देण्यात आले आहे. उर्वरित 25 टक्के अनुदानाची रक्कमही मंजूर झाली आहे. ती रक्कम लवकरच संबंधित ग्रामपंचायतींना दिली जाणार आहे. या वर्षी मात्र पालखी मार्गावरील सर्व ग्रामपंचायतींना तयारी करण्यासाठी आषाढी पालखी सोहळ्यापूर्वीच अनुदानाचे वाटप केले जाणार आहे.

Jaykumar Gore
Gore Warning To Rohit Pawar : जयकुमार गोरेंचा रोहित पवारांना सूचक इशारा; ‘आज उन्हात आहेत, ते उद्या....’

यंदाच्या आषाढी पालखी सोहळ्यापूर्वीच पालखी मार्गावरील या ग्रामपंचायतींना तयारी करण्यासाठी सरकारकडून अनुदान देण्यात येणार आहे, त्यामुळे ग्रामपंचायतींना आता वारकऱ्यांसाठी सुविधा उपलब्ध करून देणे शक्य होणार आहे. विशेष म्हणजे मागील वर्षांची थकीत आणि यंदाचे असे अनुदान देण्यात येणार आहे.

Jaykumar Gore
Maharashtra Politic's : ईडीची छापेमारी होताच संजय राऊतांनी केला थेट अमित शाहांना फोन; शाह यांच्यानंतर शेलारांचा कॉल, नेमकं त्यावेळी काय घडलं?

पंढरपूर काॅरिडाॅरचे सर्वेक्षण पूर्ण

पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरातील प्रस्तावित कॉरिडॉर सर्वेक्षणाचे काम नुकतेच पूर्ण झाले. यामध्ये 662 पैकी 510 लोकांनी काॅरिडाॅरला सकारात्मकता दर्शविली आहे. यावर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी काॅरिडाॅरला सहकार्य करणाऱ्या स्थानिक व्यापारी आणि नागरिकांचे आभार मानले आहेत. स्थानिकांनी काॅरिडाॅरबाबत सरकार सोबत राहण्याचा निर्णय घेतल्याचेही गोरे यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com