
Kolhapur News : शक्तिपीठ महामार्गावरून जिल्ह्यात दोन गट निर्माण झाल्याचे दिसत आहे. काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वात या महामार्गाला विरोध केला जात असतानाच आता राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर नेतृत्वात महामार्ग समर्थकांचा गट तयार झाला आहे. याच गटाने आज कोल्हापूरात मेळावा घेतला. तसेच ज्यांनी महामार्गाला विरोध केल्या आहेत त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
यावेळी काही जण शक्तीपीठ महामार्ग विरोधासाठी सह्या घेताना शेतकऱ्यांना दादागिरी करत आहेत. मात्र महाडिकसाहेब जिल्ह्यात तुमच्यापेक्षा जास्त दादागिरी कोण करणार आहे. आले तर आपण दोघे त्यांना दाखवू, अशा शब्दात शक्तिपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्या नेत्यांना क्षीरसागर यांनी इशारा दिला आहे. ते कोल्हापुरात आयोजित शक्तिपीठ महामार्ग समर्थनार्थ बाधित शेतकऱ्यांच्या मेळाव्यात बोलत होते.
महाविकास आघाडीने झालेल्या निवडणुकीत लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार असं सांगितलं. महाविकास आघाडीवाले थापा मारतात हे महिलांना कळलं म्हणून त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यात दहाच्या दहा जागा महायुतीला दिल्याचा टोला आमदार क्षीरसागर यांनी लगावला.
राज्याची इकॉनॉमी 2047 पर्यंत 3 ट्रिलियन डॉलरॉपर्यंत न्यायची आहे. शक्तीपीठ महामार्गाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या विकासाचा त्रिकोण तयार करायचं काम सरकार करणार आहे. लोकसभा निवडणुकीवेळी विरोधकांकडे मुद्दा नव्हता म्हणून त्यांनी शक्तिपीठ महामार्गाचा मुद्दा आणला. कोल्हापूर लोकसभेतील विजय हा महाविकास आघाडीचा नव्हे तर शाहू महाराजांच्या इमेजचा असल्याचे क्षीरसागर यांनी स्पष्ट केले.
माझ्याकडे एक हजार शेतकऱ्यांच्या सह्याचं निवेदन आहे. विकासाला विरोध करण्याचं काम ही महाविकास आघाडी करत आहे. ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी या शक्तिपीठ महामार्गासाठी जाणार आहेत. त्यांना चांगला आणि जास्तीत जास्त दर मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्यासही क्षीरसागर यांनी स्पष्ट केले.
दरम्यान खासदार महाडिक यांनी देखील यावेळी सतेज पाटील यांच्यावर जोरदार टीका करताना, महाराष्ट्राची आण बान आणि शाण वाढवणारा शक्तिपीठ महामार्ग आहे. कोल्हापूरचा विकास होऊ नये, अशी भूमिका असलेले काही याला विरोध करत असल्याचा आरोप केला आहे. हा शक्तिपीठ महामार्गात माझीही सर्वाधिक जमीन जात आहे. मी बाधित शेतकरी म्हणून समर्थन देत आहे. हा मार्ग झाल्यावर कोल्हापूरचा चेहरा मोहरा बदलणार आहे. या मार्गामुळे जमिनीच्या किमती वाढणार आहेत. अर्थचक्र वाढणार आहे. हॉटेल, थिएटर केले म्हणजे प्रगती होत नाही. पण ज्यांची जमीन या महामार्गात जाणार नाही, ते पुढारपण करत असल्याचा टोला राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी सतेज पाटलांना लगावला आहे.
(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.