महाआघाडी सोडताना राजू शेट्टींचा जयंतराव, अजित पवारांवर गंभीर आरोप

महापुरामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी; म्हणून पदयात्रा काढली. त्या पदयात्रेला मिळणारा प्रतिसाद पाहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठकीला बोलवलं होतं. पण, त्याठिकाणी त्यांनी सांगितलं एक आणि केलं दुसरंच.
Raju Shetti-Ajit Pawar-Jayant Patil
Raju Shetti-Ajit Pawar-Jayant PatilSarkarnama

कोल्हापूर : राज्यातील जलविद्युत प्रकल्प खासगी करण्याचा घाट राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी घातला आहे. त्याला उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची साथ आहे, असा गंभीर आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी कोल्हापुरातील पक्षाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत बोलताना केला. (Raju Shetti's serious allegations against Jayantrao Patil & Ajit Pawar)

हातकंणगले तालुक्यातील चोकाक येथे आज (ता. ५ एप्रिल) स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक झाली. त्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडीतून बाहेर पडत असल्याची घोषणा केली होती. त्याच वेळी त्यांनी जयंत पाटील व पवार यांच्यावर गंभीर आरोप केला. ते म्हणाले की एक नाही तर अनेक धोरणं महाविकास आघाडीने शेतकऱ्यांच्या विरोधात घेतली आहेत. अतिवृष्टी झाल्यानंतर केंद्र आणि राज्य सरकारने तातडीने मदत द्यायला पाहिजे होती. पण, दोन्ही सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं. महापुरामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी; म्हणून पदयात्रा काढली. त्या पदयात्रेला मिळणारा प्रतिसाद पाहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठकीला बोलवलं होतं. पण, त्याठिकाणी त्यांनी सांगितलं एक आणि केलं दुसरंच.

Raju Shetti-Ajit Pawar-Jayant Patil
राजू शेट्टी जाणार अरविंद केजरीवालांच्या मार्गाने!

निवडणूक लढवता यावी; म्हणून आपण चळवळ उभा केली नाही. चळवळ टिकावी; म्हणून आपण निवडणुकीचा मार्ग स्वीकारला आहे. एनडीएला पाठींबा देण्याचा निर्णय का घेतला, तर घोटाळा झाल्याचे वातावरण तयार झाले होते. अशा वेळी सर्वसामान्य नागरिकांचे मत झाले होते की एक स्वछ सरकार पाहिजे. काळा पैसा भारतात आणणारे कुणीतरी पाहिजे; म्हणून (स्व.) गोपीनाथ मुंडे यांच्या मध्यस्तीने आम्ही ‘एनडीए’मध्ये सहभागी झालो होतो. त्यावेळी आम्ही मोदी यांना तुम्ही कोणत्या मुद्द्यावर निवडणूक लढवणार आहात, हे विचारलं होतं. त्यावेळी मोदी हे विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवणार, असं बोलले होते. त्याचवेळी स्वामिनाथन समितीच्या शिफारशी लागू करणार, असं आश्वासन दिलं, तर शेतकरी तुमच्याबरोबर येईल, असं मी म्हणालो होतो, असेही शेट्टी यांनी स्पष्ट केले.

Raju Shetti-Ajit Pawar-Jayant Patil
राजू शेट्टींची मोठी घोषणा : स्वाभिमानीचा महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय

ते म्हणाले की, मी मान्य करतो की, वेळोवेळी आमच्या भूमिका बदलल्या आहेत. पण शेतकऱ्यांना चार पैसे जास्त मिळतील, या आशेने आमच्या भूमिका बदलल्या होत्या. सध्या आम्ही दररोज ईडीच्या बातम्या ऐकतो आहोत. पण, या विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना 22 हजार कोटी रुपयांना फसवलं आहे. तिकडे ईडी का पाहत नाही. माझ्याकडे सर्व पुरावे आहेत. मग, या विमा कंपन्यांना ईडी का कारवाई करत नाही

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com