
Sangli News : येथील वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्यावर गंडातर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. थकीत कर्जाच्या रक्कमेमुळे जिल्हा बँकेकडून कारखाना ताब्यात घेण्याच्या हालचालींना वेग आला आहे. कारखाना बँकेने ताब्यात घेतल्यास हा अपक्ष खासदार विशाल पाटील यांना धक्का असेल अशी जिल्ह्यात चर्चा सुरू झाली आहे.
वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना कर्जात असून तो चावण्यासाठी तसेच कर्जाची रक्कम वसूल करण्यासाठी दत्त इंडिया कंपनीला चालवण्यासाठी देण्यात आला होता. यावेळी जिल्हा बँक, वसंतदादा कारखाना व दत्त इंडिया कंपनीत त्रिपक्षीय करार झाला होता. पण दत्त इंडिया कंपनीने कारखान्याचे सुमारे 45 कोटी रुपये थकवले आहेत. यामुळे आता जिल्हा बँकेने कारवाईचा बडगा उगारला आहे.
बँकेने गेल्या तीन वर्षांत थकवलेल्या रक्कमेवरून दत्त इंडिया कंपनीला नोटीस बजावली आहे. तसेच त्रिपक्षीय करार मोडून कारखाना ताब्यात का घेण्यात येऊ नये, अशी विचारणा केली आहे. तसेच येत्या 15 दिवसात दत्त इंडिया कंपनीने आपे म्हणणे मांडावे, असेही सांगितले आहे. यामुळे एक प्रकारे हा विशाल पाटील यांनाच धक्का मानला जात आहे.
दरम्यान कारखान्याकडील थकीत कर्जाच्या वसुलीसाठी जिल्हा बँकेने याआधीच कारखान्याची स्थावर व जंगम मालमत्ता सिक्युररीटायेझशन अॅक्ट अंतर्गत ताब्यात घेतली आहे. तर थकीत कर्जाच्या वसुलीसाठी कारखाना चालवण्यासाठी निविदाही काढल्या होत्या. त्याप्रमाणे दत्त इंडिया कंपनीने प्रति टन सर्वाधिक दर भरत कारखाना चालवण्यासाठी घेतला होता. ज्याची मुदत 10 वर्षे आहे.
त्यावेळी बँकेने त्रिपक्षीय करार करताना, कारखान्याकडील कर्जाचे हप्ते कंपनीने भरावेत, कर्मचारी, व्यापारी तसेच सर्व प्रकारची शासकीय देणी कंपनीने भागवावीत, यासह विविध अटी, शर्ती घातल्या होत्या. पण गेल्या आठ वर्षात पासून कारखाना चालवणाऱ्या दत्त इंडिया कंपनीने मागित तीन वर्षांपासून बँकेची कर्जाची रक्कम थकवली आहे.
यामुळे आता बँकेकडून याबाबत वारंवार माहिती देण्यात आली असूनदेखील ते भरण्यात आलेले नाही. यामुळे अखेर थकीत कर्जापोटी बँकेने कठोर भूमिका घेतली आहे. तसेच दत्तइंडिया कंपनीला नोटीस बजावत पैसे भरल्याने करार रद्द करून कारखाना का ताब्यात घेऊ नये, अशी विचारणा केली आहे. तसेच पंधरा दिवसांत म्हणणे मांडण्यास सांगत थेट इशाराच दिला आहे.
वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना कर्जातून बाहेर काढण्यासाठी तो दत्त इंडिया कंपनीला चालवण्यासाठी देण्यात आल. त्यासाठी जिल्हा बँकेनं त्रिपक्षीय करार केला होता. या कराराप्रमाणे दत्त इंडिया कंपनीने आतापर्यंत कारखान्याचे थकीत कर्ज 50 टक्केपेक्षा जास्त भरले आहे. मात्र मागील तीन वर्षांपासून कर्जाची रक्कम भरलेली नाही. यामुळेच आता ही नोटील बँकेकडून बजावण्यात आली आहे.
कारखाना दत्त इंडिया कंपनीला चालवण्यासाठी देताना कराराप्रमाणे बँकेकडे कर्ज फिटेपर्यंत 60 कोटी रुपये ठेवीच्या स्वरूपात ठेवण्यात आले होते. पण नंतर कर्मचाऱ्यांचा पगार, देणी आणि इतर कारणांसाठी कंपनीने ही रक्कम परत घेतली. ज्यामुळे आज बँकेला थकीत कर्जाच्या रक्केसाठी दत्त इंडिया कंपनीला इशारा द्यावा लागत आहे. पण ती रक्कम बँकेकडे असती तर आज थकबाकी वसूल झाली असती. पण आता बँकेच्या हातून नामी संधी हुकल्याचे बोलले जात आहे.
जिल्हा बँक, वसंतदादा कारखाना व दत्त इंडिया कंपनीत झालेल्या त्रिपक्षीय करार प्रमाणे कारखाना दत्त इंडिया कंपनाकडे 10 वर्षे असणार आहे. सध्या आठ वर्षे झाली असून आणखीन दोन वर्षांची मुदत बाकी आहे. यामुळे मुदत संपण्यापूर्वीच बँक कारखाना ताब्यात घेणार की कराराप्रमाणे आणखी दोन वर्ष कंपनीकडे ठेवून सर्व कर्ज फेडून घेणार हेच पाहावं लागणार आहे. दरम्यान या प्रकरणी खासदार विशाल पाटील यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी प्रयत्न करण्यात आला. मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.