
Kolhapur/Sangli News : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असणाऱ्या शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात कोल्हापूर, सांगलीसह राज्यातील शेतकरी उतरले आहेत. कोल्हापूरमध्ये या महामार्गाला शक्तिपीठ संघर्ष समितीने आतापर्यंत प्रखर विरोध केला आहे. या विरोधात शेतकऱ्यांची मोठ बांधण्याचे काम महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समितीकडील सहाय्यक शिक्षक तथा चळवळीतील गिरीश फोंडे यांनी केले होते. त्यांनी यावरून मुंबईच्या आझाद मैदानापर्यंत शेतकऱ्यांना घेऊन धडक दिली होती. तर या विरोधात कोल्हापूरमधील काँग्रेसचे नेते आता विधानपरिषद आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी महत्त्वाची भूमिका पार पडत विरोधकांना आझाद मैदानावर एकत्र आणण्याचे काम केले होते.
दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शक्तिपीठ महामार्ग आणि शेतकरी कर्जमाफी वरून कोल्हापूर दौऱ्याला विरोध करू असा इशाराही गिरीश फोंडे यांनी दिला होता. मात्र उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या दौऱ्याच्या आधीच कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाने फोंडे यांना शुक्रवारी (ता.4) दणका दिला. त्यांचे तडकाफडकी निलंबन केले. आता या निलंबना विरोधात शक्तिपीठ संघर्ष समिती मैदानात उतरणार असून थेट न्यायालयीन लढाई लागणार आहे. यासाठी शेतकऱ्यांच्या घामातून पैशाची उभारणी केली जाईल असे स्पष्टीकरण समितीने एका पत्रकातून दिले आहे.
या पत्रकात फोंडे यांनी, याआधी देखील शिवाजी विद्यापीठापासून जगातील कानाकोपऱ्यात फक्त विद्यार्थी आणि युवक समाजाच्या प्रश्नांवर लढा उभा केला आहे. त्यांनी त्याचे नेतृत्व केले असून जिल्ह्यातील 50 हून अधिक गावात दारूबंदी केली आहे. अनेक शाळा वाचवण्यासाठी त्यांनी काम केल आहे. मात्र असे असताना फक्त अन्यायाविरोधात एका शिक्षकाने आवाज बुलंद केला म्हणून त्याच्यावर कारवाईचा बडगा शासनाने उभारला आहे. या शासनाच्या कारवाईचा सर्व स्तरातून निषेध होत असतानाच आम्ही देखील त्याचा निषेध व्यक्त करत असल्याचे पत्रकार म्हटले आहे.
तसेच शक्तिपीठ महामार्गाविरोधात सतत बोलत असल्यानेच सरकारने सूडबुद्धीने ही कारवाई केली आहे. मुंडे हे पुरोगामी डाव्या चळवळीचे असून एन.डी.पाटील, गोविंद पानसरे, नरेंद्र दाभोळकर यांच्याबरोबर चळवळीत त्यांनी काम केलं आहे. पण अशा पद्धतीने कारवाई करून सरकारने कष्टकरी वंचित समाजाला जाणीवपूर्वक छेडल्याचे आरोप यावेळी करण्यात आला आहे.
दरम्यान या कारवाईचे तीव्र पडसाद सांगलीतही उमटले असून सरकारने केलेली ही तडकाफडकीची कारवाई त्वरित मागे घेण्यात यावी, अशी मागणी सांगली शक्तिपीठ महामार्ग बाधित शेती बचाव कृती समितीतर्फे करण्यात आली आहे. शासनाने जर ही मागणी मान्य केली नाही, तर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वाहनांचा ताफा अडवला जाईल, असा इशारा दिला आहे.
शेतकरी कामगार पक्षाचे अध्यक्ष तथा कृती समितीचे नेते उमेश देशमुख यांनी, शक्तिपीठ रद्द झाला पाहिजे. या मागणीसाठी गेल्या वर्षभरापासून शेतकरी आंदोलन करत आहेत. या आंदोलनात कोल्हापूर जिल्ह्यातील सहभाग असलेले गिरीश फोंडे यांना आयुक्तांनी निलंबन केले आहे. कोणतीही नोटीस न देता अशा पद्धतीने बेकायदेशीर रित्या त्यांचे निलंबन करण्यात आल्याचा दावा देशमुख यांनी केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.