Lok sabha Election 2024 : काँग्रेस-ठाकरे गटात मतभेद, शिवसेनेच्या मंत्र्याचा मोठा दावा...

Shambhuraj Desai News : काँग्रेस-शिवसेना ही काही नैसर्गिक युती नाही. वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि अटबिहारी वाजपेयी यांनी शिवसेना- भारतीय जनता पक्ष विचाराने एकत्रित आणले होते
 uddhav thackeray, Rahul Gandhi
uddhav thackeray, Rahul Gandhisarkarnama
Published on
Updated on

Political News : केंद्रात नरेंद्र मोदी-अमित शाह आणि राज्यात शिंदे-फडणवीस यांना टक्कर देण्याच्या तयारी असलेल्या इंडिया आघाडीत बिघाडी झाली आहे. या आघाडीत उरल्यासुरल्या पक्षांत जागावाटपाचा वाद सुरू असताना शिंदे सरकारमधील मंत्री शंभूराज देसाई यांनी आघाडीतील कुरबुरींवर भाष्य करत आघाडीतील भांडणामध्ये तेल ओतण्याचे काम केले आहे. ठाकरे आणि काँग्रेसमध्ये कधीच एकमत होणार नाही, असा दावा शंभूराज देसाईंनी केला आहे.

 uddhav thackeray, Rahul Gandhi
India Budget 2024 : 'महागाई तितकीशी वाढली नाही, लोकांचे उत्पन्न वाढले'; सीतारमण यांचा दावा!

राज्यात महायुतीच्या सरकारच्या विरोधात महाविकास आघाडी एकवटी आहे. जागा वाटपावर दोघांमध्ये चर्चा होत आहेत. मात्र, चर्चेचे घोडे आठ ते नऊ जागांवर अडकले आहे. काँग्रेसने दावा केलेल्या नऊ जागा शिवसेना (ठाकरे गट) सोडण्यास तयार नाही. तर, काँग्रेस देखील मागे हटायला तयार नाही. त्यामुळे जागा वाटपाचा तिढा सुटत नाही. यावर भाष्य करताना शिवसेना (ठाकरे गट)- काँग्रेसमध्ये (Congress) कधीच एकमत होणार नाही. दोघांची विचारसरणी भिन्न आहे. त्यामुळे लोकसभाच काय विधानसभा निवडणुकीच्या वेळी देखील या दोघांमध्ये वाद होतील, असा दावा शंभूराज देसाई (Samburaj Desai) यांनी केला. (lok sabha election 2024)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महायुती 45 जागा जिंकेल...

महाविकास आघाडीत काय व्हायचे ते होवू द्या. मात्र, महाराष्ट्रातील जनतेचे एकमत झाले आहे. पुन्हा एकदा देशाला पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदीच पाहिजेत. तेव्हा महायुतीतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या यांच्या नेतृत्वात आम्ही 45 पेक्षा अधिक लोकसभेच्या जागा जिंकू, असा दावा शंभूराज देसाई यांनी केला आहे. 

काँग्रेस-शिवसेना ही काही नैसर्गिक युती नाही. वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि अटबिहारी वाजपेयी यांनी शिवसेना- भारतीय जनता पक्ष विचाराने एकत्रित आणले होते. त्यांची नैसर्गिक युती झाली होती. ठाकरे गट आणि काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची विचारसरणी कधीच एक होऊ शकत नाही. केवळ गेल्या साडेतीन वर्षापूर्वी सत्तेसाठी महाविकास आघाडी झाली. आता केवळ लोकसभेला 8-9 जागांवर मतभेद झाले आता पुढे विधानसभेला प्रत्येक जागेवर मतभेद होणार आहेत.

'या' जागांवर वाद

रामटेक, हिंगोली, वर्धा, भिवंडी, जालना, शिर्डी, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई उत्तर पश्चिम या लोकसभेच्या जागांवरून वाद असल्याचे सांगितले जात आहे. यामधील 5 जागांवर शिंदेच्या गटातील खासदाराचा समावेश आहे तर 3 जागेवर भाजपाचे खासदार आहेत.

(Edited By Roshan More)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com