Sambhajiraje Chhatrapati: संभाजीराजेंनी हात जोडले; आता बास! मी कोल्हापूरला नको असेल तर थांबतो...

Vishalgad Encroachment Issue Case Sambhajiraje Chhatrapati: मी माझा प्रामाणिक हेतू घेऊन गड संवर्धनाचे काम करीत आहे.पण त्या ठिकाणीही मला त्रास दिला जातोय. पण आता या सगळ्या गोष्टी नको वाटत आहे.
Sambhajiraje Chhatrapati
Sambhajiraje Chhatrapati sarkaranama
Published on
Updated on

Kolhapur News: विशाळगडावरील बेकायदेशीर अतिक्रमणाविरोधात (Vishalgad Encroachment) कोल्हापूर जिल्ह्यातील वातावरण तणावपूर्ण बनले आहे. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आक्रमक भूमिका घेत 'चलो विशाळगड'चा नारा दिला. त्यानंतर किल्ले विशाळगडावर निर्माण झालेल्या परिस्थितीनंतर संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी पत्रकार परिषद घेत खंत व्यक्त केली.

अतिक्रमणाशी ज्यांचा काडीमात्र संबंध नाही, अशा कुटुंबियांच्या घरावर दगडफेक, जाळपोळ केल्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांना अप्रत्यक्षपणे लक्ष केले जात आहे. त्यावर संभाजीराजे यांनी आज आपली भूमिका मांडत कोल्हापूरकरांना हात जोडले आहेत.

गड किल्ल्यासंदर्भात सातत्याने मी भूमिका मांडत आलो आहे. मात्र राज्यातील एकाही नेत्याला आणि आमदार खासदारांना गड किल्ल्या संदर्भात आवाज उठवायला नको. केवळ राजकारणासाठीच त्यांना गड किल्ले हवेत. मी माझा प्रामाणिक हेतू घेऊन गड संवर्धनाचे काम करीत आहे. पण त्या ठिकाणीही मला त्रास दिला जातोय. पण आता या सगळ्या गोष्टी नको वाटत आहे. मी कोल्हापुरला नको असेल तर आता बास झालं. मी आता त्रासून गेलो आहे, अशा शब्दात संभाजीराजे छत्रपती यांनी माध्यमांसमोर खंत व्यक्त केले.

राज्यस्थान यासारख्या राज्याला तेथील गड किल्ल्यांना कोणत्याही धगधगता इतिहास नसताना तेथील गड किल्ले आजही सुस्थितीत आहेत. पण महाराष्ट्रातील गड किल्ले पाहून वेदना होतात. आघाडी सरकारच्या काळात केवळ रायगडावर एक कोटी इतका खर्च करण्यात आला आहे. पण मी खासदार झाल्यापासून जवळपास कोट्यावधीचा निधी या रायगडच्या कामासाठी आणला. रायगडवर मी कोणाला एक रुपया खाऊ देत नाही. तरीही माझ्यावरच आरोप केले जातात. या सर्व गोष्टीला मी त्रासलो आहे, अशी खंत संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केली.

मी उशिरा विशाळगडावर गेलो ही माझी खंत आहे. या आधीच मी तिथे जायला हवं होते. तुम्ही माझी चूक काढता. पण कधी रायगडच्या बाबतीतही मला विचारा. राज्यातील सर्वच गड किल्ल्यांवरील अतिक्रमणाला सर्वच पक्ष जबाबदार आहेत, असा आरोप संभाजीराजे छत्रपती यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com