Assembly Elections 2024 : 76 लाख मतं कशी आली? महाराष्ट्र मुख्य निवडणूक अधिकारी अन् केंद्रीय आयोगाला हायकोर्टाची नोटीस

Prakash Ambedkar petition Bombay High Court assembly elections 2024 Central Election Commission Maharashtra Chief Electoral Officer notice : विधानसभा निवडणुकीला सायंकाळी वाढलेल्या मतदानाची विचारणा करणारी याचिकेची उच्च न्यायालयाकडून दखल.
Assembly Elections 2024
Assembly Elections 2024Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र मुख्य निवडणूक अधिकारी आणि केंद्रीय निवडणूक आयोगाला नोटीस बजावली आहे. विधानसभा निवडणूक 2024 मध्ये सायंकाळी सहा वाजल्यानंतर 76 लाख मतदान कशी वाढली, यावर खुलासा करण्यासाठी ही नोटीस बजावली आहे.

दोन आठवड्यात खुलासा करण्याचे नोटीस म्हटले आहे. उच्च न्यायालयाच्या या नोटीसीमुळे निवडणुकीत नेमकी मतदान कसं वाढलं, यावर निवडणूक आयोग काय खुलासा देते, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

विधानसभा निवडणूक (Election) 2024 मध्ये सायंकाळी सहा वाजल्यानंतर 76 लाख मतदान कसं वाढलं, यावर याचिकाद्वारे आक्षेप घेण्यात आला आहे. मतदानाचे व्हिडिओ देण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयात याचिकेवर झालेल्या सुनावणीदरम्यान, प्रकाश आंबेडकर यांनी जोरदार युक्तिवाद केला. न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती कलम खाता यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली.

Assembly Elections 2024
Shirdi Double Murder : मर्डर करणारे कोण? सुजय विखे म्हणाले, 'मोफत अन्नछत्र, मोफत शिर्डी करून ठेवलीय...' (पाहा VIDEO)

या याचिकेची उच्च न्यायालयाच्या (Court) खंडपीठाने दखल घेत, महाराष्ट्र मुख्य निवडणूक अधिकारी आणि केंद्रीय निवडणूक आयोगाला, नोटीस बजावली आहे. विधानसभा निवडणुकीवेळी सायंकाळी सहा वाजल्यानंतर झालेल्या मतदानाचा स्लिपचा रेकाॅर्ड निवडणूक आयोगाकडे याचिकेद्वारे मागितला आहे, तो अद्याप दिलेला नाही. सायंकाळी सहा वाजल्यानंतरचे व्हिडिओ द्यावे. व्हिडिओग्राफी केली का? असा युक्तिवाद प्रकाश आंबेडकर यांनी केला.

Assembly Elections 2024
Rahul Gandhi Speech : राहुल गांधींना आवडली मोदींची ‘ती’ योजना; लोकसभेत त्यांच्यासमोर पहिल्यांदाच केलं मान्य, पण...

निवडणूक आयोगाने आदर्श नियमावली पाळली नाही, असाही आक्षेप प्रकाश आंबेडकर यांनी घेतला. उच्च न्यायालयाने याचिकेची दखल घेत मुख्य निवडणूक अधिकारी आणि केंद्रीय निवडणूक आयोगाला नोटीस बजावली. दोन आठवड्यात नोटीसीला उत्तर देण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, "निवडणुकीचा निकाल देताना, पोल व्होटस् अन् काऊंटर व्होटस् यांची जुळवणी झाली पाहिजे. ती झाली नसेल, तर रिटर्निंग ऑफिसरने तो दस्ताऐवज निवडणूक आयोगाकडे पाठवले पाहिजे आणि निवडणूक आयोगाने त्यावर जे निर्देश देतील, त्यानुसार निकाल पाहिजे".

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com