
Mumbai News : शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सुट्टीहून मायदेशी परतातच नव्या जोमाने कामाला लागले आहेत. शुक्रवारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी त्यांची भेट घेतली. या भेटीत आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आणि राज ठाकरे यांच्यासोबतची संभाव्य युती या पार्श्वभूमीवर चर्चा झाली. त्यानंतर शनिवारी लगेचच ठाकरे यांनी शिवसेना भवन येथे जिल्हाप्रमुखांची बैठक आयोजित केली होती.
आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीची तयारी सर्वच पक्षाने सुरु केली आहे. अशात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सुट्टी निमित्ताने परदेशात गेले होते. पण सुट्टीहून मायदेशी परतातच ते नव्या जोमाने कामाला लागले आहेत. त्यासाठी त्यांनी आतापासूनच नेतेमंडळींच्या बैठकीचा धडाका लावला आहे. शिवसेना भवनात आयोजित बैठकीला त्यांनी पदाधिकारी, खासदार, आमदारांना मार्गदर्शन केले अन् निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेशही दिले आहेत.
या आढावा बैठकीत त्यांनी नेत्यांना महाराष्ट्रभर दौरा करण्याचे आदेश दिले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका होणार असल्याने नेतेमंडळीने संपूर्ण राज्य पिंजून काढण्याचे आदेश दिले आहेत. त्यासोबतच नेतेमंडळीने स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन त्याबाबतचा अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे. तसेच नागरिकांच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रीत करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.
नागरिकांच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करा
संपर्कप्रमुख, जिल्हाप्रमुख सर्वजण या बैठकीला उपस्थित होते. राज्यातील प्रश्नांवर चर्चा झाली. भारत पाकिस्तान युद्धजन्य परिस्थितीमुळे इतर राज्यातील प्रश्न हे बाजूला राहिले आहेत. त्यामुळे लोकांच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करा, असे त्यांनी सांगितले. लाडकी बहीण शेतकऱ्यांचे प्रश्न असेल, असे अनेक प्रश्न विचारात घ्यावे आणि त्यावर काम करावे. जनसामान्यांचे प्रश्न समजून घ्यावे, असेही उद्धव ठाकरेंनी सांगितले.
विरोधकांच्या आरोपांनाही दिले प्रत्युत्तर
यावेळी त्यांनी विरोधकांच्या आरोपांनाही प्रत्युत्तर दिले. आमचे जहाज बुडणारे नाही. तर भाजपचे ओव्हरलोड झालेले जहाज हे बुडणारे आहे. अमित शहा हे तीन पक्षांचे प्रमुख आहेत. ते अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचेही प्रमुख आहेत. सत्ता येते व जाते. सत्ता आल्यावर हुरळून जायचे नाही व सत्ता गेल्यावर दु:ख नाही करायचे. परत सत्ता मिळवण्यासाठी कष्ट, प्रयत्न करायचे असतात. ज्यांना आपण खूप काही दिलं ते पक्ष सोडून जात आहेत. ते पक्ष सोडून गेले तरी आपल्या पक्षावर काही परिणाम होणार नाही. ज्याला सोडून जायचे त्याला जाऊ द्या. कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत, असेही ठाकरे यांनी स्पष्ट केले.
देशाच्या विरोधात नाही पण सरकारच्या विरोधात
आपला वैचारिक विरोध असेल पण देशावर काही संकट आलं तर आम्ही कायम पंतप्रधान यांच्यासोबत असू. आम्ही देशाच्या विरोधात नाही पण सरकारच्या विरोधात आहोत. 'वन नेशन वन इलेक्शन'चा अभ्यास सुरु आहे, कमिटी महाराष्ट्रात आहे पण निवडणूक ही पारदर्शकपणे घ्या, असा सल्ला देखील त्यांनी सत्ताधारी मंडळींना दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.