Maharashtra Cabinet Extension : विखेंचा मंत्रिमंडळात समावेश निश्चितच; महसूल खाते कायम राहणार का?

Ahilyanagar Radhakrishna Vikhepatil oath Nagpur Legislative Session CM Devendra Fadnavis cabinet : अहिल्यानगर जिल्ह्यातील भाजपचे दिग्गज नेते राधाकृष्ण विखे यांना नागपूर येथे शपथ घेण्यास उपस्थित राहण्याचे निमंत्रण मिळाले आहे.
Radhakrishna Vikhe
Radhakrishna VikheSarkarnama
Published on
Updated on

Ahilyanagar News : भाजपचे अहिल्यानगर जिल्ह्यातील दिग्गज नेते राधाकृष्ण विखे यांना नागपूर येथे शपथ घेण्यास उपस्थित राहण्याचे निमंत्रण देण्यात आले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील सागर निवासस्थानी विखेंनी शनिवारी सायंकाळी भेट घेतली. तिथेच फडणवीस यांनी विखेंना मंत्रिमंडळात समावेश निश्चित केला. तसेच विखेंना नागपूरमध्ये शपथ घेण्यास उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडून मंत्रिमंडळात समावेशाचे निश्चित झाल्यानंतर आणि शपथ घेण्याचे निमंत्रण मिळाल्यानंतर राधाकृष्ण विखे यांनी राहाता इथं येत, श्रीक्षेत्र निझर्णीश्वराचे दर्शन घेतले. तसेच लोणी बुद्रुक इथं ग्रामदैवत श्री म्हसोबा महाराजांच्या यात्रोत्सवात सहभागी होत दर्शन घेतले. यात्रेनिमित्ताने काढण्यात आलेल्या काठीची विधीवत पूजा राधाकृष्ण विखे आणि माजी खासदार सुजय विखे यांच्या हस्ते झाली. यानंतर साईदरबारी हजेरी लावत विखेंनी साईसमाधीचे दर्शन घेऊन ते, नागपूरला रवाना झाले आहेत.

Radhakrishna Vikhe
BJP Sujay Vikhe : 'त्यांचे आमदार-खासदार-कार्यकर्ते पळून जाऊ लागले'; विखे म्हणाले, ''EVM' ला विरोध हा रडीचा डाव'

राधाकृष्ण विखे 1995 ते 2024 या कालावधीत शिर्डी (Shirdi) विधानसभा मतदारसंघाचे सलग प्रतिनिधित्व करत आहेत. मतदारसंघातून ते सलग आठव्यांदा निवडून आले आहेत. यापूर्वी त्यांनी कृषी, शालेय शिक्षण, विधी व न्याय, विरोधी पक्षनेते, गृहनिर्माण, महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री म्हणून कामकाज संभाळले आहे. नवीन होणाऱ्या मंत्रिमंडळात त्यांच्याकडे महसूल खाते कायम राहणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Radhakrishna Vikhe
Satyajeet Tambe : थोरातांचे भाचे सत्यजित तांबेंनी घेतली सीएम फडणवीसांची भेट; राजकीय भूकंपाची शक्यता? नेमकं काय शिजलं?

राधाकृष्ण विखे यांनी नागपूरला रवाना होण्यापूर्वी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, "राज्यातील जनतेने महायुती सरकारला मोठे पाठबळ दिले आहे. बहुमत दिले आहे. यामुळे सरकारची जबाबदारी वाढली आहे. जनेतच्या मानतील अपेक्षा पूर्ण करण्याला सरकारचे पहिले प्राधान्य राहील. देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या पहिल्या 100 दिवसांच्या कृती आराखड्याच्या कार्यक्रमाची संपूर्ण अंमलबजावणी करण्याचे उद्दिष्ट आम्ही पूर्ण करणार आहोत".

अहिल्यानगर जिल्ह्यातील विकासाला गती देण्याचे पहिले प्राधान्य राहणार आहे. औद्योगिक विकास आराखडा तयार आहे. त्यावर अधिक काम करणार आहोत. तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती दिनाला यंदा तीनशे वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीने त्यांचे स्मारक उभारले जाणार आहे. संत ज्ञानेश्वर सृष्टीची निर्मिती, गोदावरी कालव्याचे नूतनीकरण आणि निळवंडे कालव्याचे राहिलेले काम पूर्णत्वास नेण्याचे आपले उद्दिष्ट राहणार असल्याचे विखे यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com