
Rahuri road protest news : अहिल्यानगर-मनमाड रस्त्याची दुरूस्तीची मागणी करत राहुरी इथं रास्ता रोको आंदोलनाचा थेट फटका जिल्हाधिकारी डाॅ. पंकज आशिया यांना बसला आहे.
जिल्हाधिकारी डाॅ. पंकज आशिया शिर्डीच्या दिशेने चालले होते. आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांचे वाहन पाहताच अधिक आक्रमक झाले. वाहनात बसलेले जिल्हाधिकारी देखील पुढे उशिर होतो म्हणून देखील संतापले होते. यातून आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या वाहनाला गराडा घातला. यामुळे बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांचा गोंधळ उडाला. पोलिसांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या वाहनाला गराडा घातला अन् वाहनाचा ताफा वेगळ्या मार्गाने काढून दिला. मात्र मनमाड रस्त्याच्या दुरूस्तीचं काय होणार, हा विषय नेहमीसारखा चर्चेचा राहिला.
अहिल्यानगर-मनमाड रस्त्याच्या दुरूस्तीसाठी राहुरी फॅक्टरी इथं तब्बल दोन तास रास्ता रोको आंदोलन झाले. याच वेळी जिल्हाधिकारी डाॅ. पंकज आशिया हे शिर्डीकडे (Shirdi) त्यांच्या वाहनानं चालले होते. या आंदोलनाचा फटका त्यांच्या वाहनाला बसला. जिल्हाधिकारी यांचे वाहन आंदोलकांनी अडवले. जिल्हाधिकारी यांचे वाहन पाहून आंदोलकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या.
काही आंदोलकांनी जिल्हाधिकारी यांच्या वाहनाच्या दिशेने धाव घेत, गराडा घातला. काहींनी बाहेर या, रस्त्याच्या दुरावस्था पाहा, रोज किती जणांचे जीव जात आहे, याची दखल घ्या, असा आरडाओरडा केला. आक्रमक आंदोलकांनी वाहन अडवल्याने जिल्हाधिकारी देखील संतापले होते. पोलिसांनी (Police) प्रसंगावधान राखत जिल्हाधिकारी यांच्या वाहनाला गराडा घातला. पोलिसांनी जिल्हाधिकारी डाॅ. पंकज आशिया यांना पर्यायी मार्ग सुचवत, त्यांच्या वाहनाचा ताफा तेथून पुढे काढून दिला.
अहिल्यानगर-मनमाड रस्त्याची दुरूस्ती हा गेली अनेक वर्षांपासून कळीचा मुद्दा ठरला आहे. या रस्त्याच्या दुरूस्तीसाठी सोमवारी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली मुंडन आंदोलन करण्यात आले. ठेकेदार कंपनी, संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी माजी मंत्री तनपुरे यांनी मागणी या वेळी केली.
दरम्यान, या रस्त्याच्या दुरूस्तीवरून केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी हा रस्ता पूर्ण करू शकत नसल्याची लाज वाटते, अशी प्रतिक्रिया दिली होती. खासदार नीलेश लंके यांनी देखील या रस्त्याच्या दुरूस्तीसाठी आंदोलन केले. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी देखील या रस्त्याचे काम मार्गी लागावं यासाठी प्रयत्नशील आहेत. वेळोवेळी अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन सूचना केल्या जात आहेत. परंतु प्रत्यक्षात रस्त्याचे काम काही मार्गी लागत नाही. मात्र या नादुरूस्त रस्त्यामुळे शेकडो लोकांचा अपघातात प्राण गेले आहेत तर, अनेकजण कायमचे जायबंदी झाले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.