Jalgaon Shasan Aplya Dari : मुख्यमंत्री पोहचण्यापूर्वीच जळगावात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची धरपकड; काय आहे कारण ?

Eknath Khadse In Jalgaon : शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री जळगावात
Rohini Khadse, NCP
Rohini Khadse, NCPSarkarnama
Published on
Updated on

Jalgaon Shasan Aplya Dari And Eknath Shinde : जळगाव येथे मंगळवारी (ता. २७) शासन आपल्या दारी या उपक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जळगावात येणार आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्याचाही इशारा दिला होता.

मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस जळगावात पोहचण्यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून काळे झेंडे दाखवण्याचा इशाऱ्याच्या पार्श्वभूमिवर ही कारवाई करण्यात आली आहे. यात माजी आमदार रोहिणी खडसे यांच्यासह जिल्हा, तालुक्यातील पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील राजकारण वातावरण चांगलेच तापले आहे.

Rohini Khadse, NCP
Sujay Vikhe Patil Statement: पंकजा मुंडे यांचा DNA भाजप'चा; पक्ष सोडणार नाहीत; खासदार सुजय विखेंना विश्वास!

दरम्यान, सोमवारी आंदोलनावेळी एकनाथ खडसे यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले होते. माजी मंत्री खडसे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले, "महापालिकेच्या आयुक्तांनी महापालिकेच्या सर्व शाळेच्या मुख्याध्यापकांना पत्र देऊन कुटुंबीयांसह ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाला उपस्थित राहा. शाळा बंद ठेवा, मुख्याध्यापकांसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी गणवेश घालून, आयकार्ड घालून कार्यक्रमाला येण्याचे फर्मान काढले आहे." तर रोहिणी खडसे यांनी रेशन दुकानदाराने सर्व रेशनकार्डधारकांना पाठवलेला मेसेजच वाचून दाखवला होता.

Rohini Khadse, NCP
Bhagirath Bhalke Join BRS : मोहोळचा पोपट काल खूप बोलून गेला, पण, भालके काय चीज आहे, ते त्याला दाखवतो;भालकेंचे उमेश पाटलांना चॅलेंज

रोहिणी खडसे यांनी सांगितले की, "मुख्यमंत्री २७ जूनला जळगावला येत आहेत. रेशन कार्डधारकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे, अन्यथा पुढील चार ते पाच महिन्यांचे रेशन मिळणार नाही, असे व्हॉट्‌सॲपवर आलेल्या संदेशमध्ये म्हटले असल्याचे रोहिणी खडसे यांनी सांगितले. वरील मुद्यांवरून सर्वांनीच जिल्हाधिकाऱ्यांना जाब विचारत या कार्यक्रमाला येण्याची सक्ती नागरिकांना केली जात आहे. शासन स्थानिक लहान प्रश्न सोडवित नाही अन्‌ नागरिकांना आपल्या दारी बोलवितो. वास्तविक नागरिकांच्या घरी जाऊन लाभ देणारे शासन हवे."

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com