Bachchu Kadu : बच्चू कडूंचा शेतकऱ्यांना एक सल्ला, म्हणाले सरकार आपोआप ठिकाणावर येईल..

Bachchu Kadu advice farmers : शेतकरी कर्जमाफीसह शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक व नेते बच्चू कडू यांनी राज्यातील महायुती सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे.
Bachchu Kadu
Bachchu KaduSarkarnama
Published on
Updated on

Bachchu Kadu : प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक माजी मंत्री बच्चू कडू यांनी शेतकरी प्रश्न व कर्जमाफीवरुन सरकारला चांगलच धारेवर धरलं आहे. प्रहार जनशक्ती पक्षाच्या शेतकरी हक्क यात्रेच्या माध्यमातून ते सरकारवर हल्लाबोल करताना दिसत आहेत. त्याचवेळी त्यांना आता शेतकऱ्यांना एक सल्ला दिला आहे.

बच्चू कडू म्हणाले आता शेतकरी जोपर्यंत एकत्र येऊन काही करत नाही तोपर्यंत सरकार ठिकाण्यावर येणार नाही. त्यामुळे तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला पुरेल एवढेच पिकवा, सरकार आपोआप ठिकाणावर येईल असा सल्ला त्यांनी आता शेतकऱ्यांना दिला आहे. नाशिकच्या देवळा तालुका प्रहार जनशक्ती पक्षातर्फे झालेल्या हक्कयात्रेप्रसंगी खामखेडा या गावात ते बोलत होते.

बच्चू कडू पुढे म्हणाले, निवडणुकीवेळी मतांसाठी शेतकऱ्यांचा सातबारा उतारा कोरा करू असे आश्वासन या सरकारने दिले. पंरतु निवडणुकीनंतर आता या सरकारला शेतकऱ्यांचा विसर पडला आहे. सरकारला जाब विचारण्यासाठी आपण शेतकरी म्हणून एकत्र येत नाही, हीच सर्वांत मोठी शोकांतिका असल्याचे कडू म्हणाले.

Bachchu Kadu
Sanjay Raut : नाशिक महापालिकेत दोन्ही ठाकरेंचं एकमत ! संजय राऊतांच्या एका वक्तव्याने भाजपची उडाली झोप

मला सरकार नव्हे तर शेतकरी समस्या वाटत आहेत. शेतकरी एकत्र येत नाहीत अशी खंत त्यांनी बोलून दाखवली. मी शेतकऱ्यांसाठी लढतोय, मात्र शेतकरी सोबत येत नाही असही म्हणाले. जोपर्यंत शेतकरी एकत्र येणार नाही तोपर्यंत सरकार ठिकाणावर येणार नाही, असे सांगत त्यांनी सरकारला शेतकऱ्यांचा सातबारा उतारा कोरा करण्याचे आवाहन केले.

Bachchu Kadu
Nashik Crime : ‘प्रोटेक्शन मनी’पासून गोळीबारापर्यंत, नाशिकमधील माजी नगरसेवक पुत्राच्या अडचणी वाढण्याची शक्यता

लाडकी बहिणी योजनेवर बोलताना, 'लाडक्या बहिणी आम्हाला पगार द्या म्हणून मागत नव्हत्या'. तुम्ही निवडणुकीत सातबारा कोरा करू असे आश्वासन शेतकऱ्याला दिले होते. आता तुमची सत्ता आली आहे ना, मग आता तोंड का फिरवित आहात ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच २८ ऑक्टोबरला नागपूरला मोर्चा निघणार आहे. शेतकरी कर्जमाफी, पिकांची नुकसान भरपाई व हमीभावाच्या मागणीसाठी हा मोर्चा आपण काढत आहोत. त्यावेळी सगळ्यांनी विधानभवनावर मोर्चासाठी उपस्थित राहा, असे आवाहन त्यांनी शेतकरी बांधवांना केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com