Narendra Modi Politics : कांदा प्रश्नावर पंतप्रधान मोदींना घरचा आहेर... भाजप नेत्यांनी टोचले कान !

BJP leader Bapurao Pingle criticize BJP government on onion issue : भारतीय जनता पक्षाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन निर्यात धोरण ठरवले पाहिजे.
Narendra Modi
Narendra ModiSarkarnama

Onion issue News : केंद्रातील भाजप सरकारने नाफेड मार्फत पाच लाख टन कांदा खरेदीचा निर्णय घेतला आहे. त्याचा शेतकऱ्यांना फारसा फायदा होण्याची शक्यता नाही. याबाबत भाजप पदाधिकाऱ्यांनीच सरकारला घरचा आहेर दिला आहे. केंद्र सरकारने धोरण ठरवितांना शेतकऱ्यांचा विचार केला पाहिजे.

भारतीय जनता पक्षाचे (BJP) शेतकरी आघाडीचे प्रमुख बापूराव पिंगळे यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या आहेत. केंद्राने धोरण ठरवितांना शेतकऱ्यांचा विचार केला पाहिजे. त्यांच्या अडचणी समजून घेतल्या पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. नाफेड बाबत केंद्र सरकारने घेतलेला ताजा निर्णय म्हणजे, 'बैल गेला आणि झोपा केला' असा आहे. वस्तुत: बाजारपेठेत कांदा दर पडले तेव्हाच 'नाफेड'ने बाजारात उतरून मोठ्या प्रमाणावर कांदा खरेदी करणे अपेक्षित होते. मात्र त्यांनी ते केले नाही.

Narendra Modi
Mahayuti Politics : नाशिक शिक्षक मतदारसंघात महायुतीमध्ये बिघाडी? शिंदेसेनेविरोधात अजित पवार गट 'अ‍ॅक्टिव्ह'

नाफेडच्या अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद वाटते,असा आरोप करीत 'नाफेड'चे अधिकारी कोणासाठी काम करतात? याची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी करून पिंगळे यांनी केंद्रातील भाजप सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. नाफेड ही व्यापारी पेढी नाही. ती बाजार संतुलनाचे काम करणारी आणि केंद्र सरकारच्या अखत्यारीतील शेतकऱ्यांसाठीची संस्था आहे. ती कृषी खात्याच्या अखत्यारीत काम करते. कांद्याचे भाव योग्य, माफक ठेवण्याचे काम नाफेड मार्फत केले जाते. मात्र तसे झालेले दिसत नाही.

Narendra Modi
Narendra Modi : मोदींनी '400 पार'चा टप्पा का ओलांडला नाही? 'एमआयएम'च्या आमदारानं सांगितलं कारण

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रारंभी सरकारने कांदा निर्यात बंदी केली. त्यासाठी सरकारला कोणी चुकीचा सल्ला दिला, याचाही तपास लावला पाहिजे. हा निर्णय घेताना केंद्र शासनाने शेतकरी (Farmer) आणि व्यापारी यांचा किती तोटा होईल, याचा विचार केला नाही. त्यामुळे या व्यवसायाशी संबंधित सर्व घटक सरकार विरोधात गेले. मतदारांच्या रोषाला भाजपला बळी जावे लागले, असेही पिंगळे यांनी म्हटले.

कांदा निर्यात बंदीचा भारतीय जनता पक्षाच्या सरकारचा निर्णय पूर्णतः चुकीचा होता. त्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रचंड मोठा फटका बसला. कोट्यावधींचे नुकसान झाले. निवडणुकीत भाजपला त्याची किंमत मोजावी लागली. आता भाजपच्या पदाधिकाऱ्याने सरकारचे कान टोचत त्यांना घरचा आहेर दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com