Narendra Modi : मोदींनी '400 पार'चा टप्पा का ओलांडला नाही? 'एमआयएम'च्या आमदारानं सांगितलं कारण

mufti muhmmad ismail On Bjp : दहा वर्षात मुस्लिम समाजाला 'लव जिहाद' याचा मोठ्या प्रमाणावर सामना करावा लागला, असं आमदार मुफ्ती यांनी म्हटलं.
Asaduddin Owaisi narendra modi
Asaduddin Owaisi narendra modisarkarnama

गेल्या दहा वर्षात मुस्लिम समाजाला लव जिहाद, लँड जिहाद आणि आता व्होट जिहाद यांसारख्या प्रश्नांना सामोरे जावे लागले.

भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) आजही हिंदू मुस्लिम, असा वाद करीत बसले आहेत, अशी टीका आमदार मौलाना मुफ्ती मोहंमद इस्माईल यांनी केली.

"यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मुस्लिम समाज जागृत झाला. त्याने मतदान करून धर्मनिरपेक्ष उमेदवारांना विजयी केले. हा समाज जागृत झाल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे '400 पार' हे स्वप्न साकार होऊ शकले नाही.

भारतीय जनता पक्ष यापासून धडा घेणार की, पुन्हा तेच जुने आरोप उघडत बसणार," असा प्रश्न आमदार मुक्ती यांनी केला आहे.

बकरी ईद निमित्त मालेगाव येथे झालेल्या कार्यक्रमात धार्मिक नेते आणि 'एमआयएम'चे आमदार मौलाना मुफ्ती मोहंमद इस्माईल यांनी राजकीय तसेच सामाजिक प्रश्नांवर आपले मत व्यक्त केले.

"भारतीय जनता पक्षाचे ( Bjp ) सरकार केंद्रात आले. त्या दहा वर्षात मुस्लिम समाजाला लव जिहाद याचा मोठ्या प्रमाणावर सामना करावा लागला. सध्या देशात मुस्लिमांनी मोठ्या प्रमाणात मतदान केल्याने त्याला आता 'वोट जिहाद' असे नाव देण्यात आले आहे. निवडणुकीतही पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतःच हिंदू मुस्लिम असा वाद करत होता. सतराव्या लोकसभा निवडणुकीत मुस्लिम मतदारांचा टक्का वाढला. त्यामुळे भाजपचे '400 पार'चे स्वप्न भंग झाले. असा दावा मुफ्ती यांनी केला.

"मतदान हा राज्यघटनेने दिलेला अधिकार आहे. त्याचा वापर समाज बांधवांनी शंभर टक्के करावा. याबाबत आता आपण जागरूक झाले पाहिजे. मालेगाव मतदार संघात यंदा 64 टक्के मतदान करून मुस्लिम समाजाने धर्मनिरपेक्ष उमेदवाराला लोकसभेत पाठविले आहे," असं मुफ्ती यांनी म्हटलं.

Asaduddin Owaisi narendra modi
Mahayuti Politics : नाशिक शिक्षक मतदारसंघात महायुतीमध्ये बिघाडी? शिंदेसेनेविरोधात अजित पवार गट 'अ‍ॅक्टिव्ह'

"देशात 25 कोटी मुस्लिम समाज बांधव राहतात. सच्चर आयोगाने या समाजाची अवस्था दलितांपेक्षाही बिकट आहे, असे म्हटले आहे. भाजपने 'सबका साथ सबका विकास' असा नारा दिला. त्यात मुस्लिम समाज कुठे आहे? त्यांना डावलेले गेले. हा कोणता 'सबका साथ' आहे? देशाचा विकास करायचा असेल, तर मुस्लिम समाजाचा देखील विकास झाला पाहिजे. त्यांना सोबत घ्यावे लागेल," असं मुफ्ती यांनी म्हटलं आहे.

( Edited By : Akshay Sabale )

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com