महापालिकेत भाजप १०० जागा मिळवेल, शिवसेनेने दिवास्वप्न पाहू नये!

भाजपचा नाशिक हा बालेकिल्ला असून, यापुढेही तो कायम राहील.
Jaykumar Rawal (BJP)  & Sanjay Raut (Shivsena)
Jaykumar Rawal (BJP) & Sanjay Raut (Shivsena) Sarkarnama

नाशिक : भाजपचा नाशिक हा बालेकिल्ला असून,यापुढेही तो कायम राहील. भाजपच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडून सत्ता काबीज करण्याचे स्वप्न शिवसेनेने बघू नये, भ्रमनिरास झाल्या शिवाय राहणार नाही. असा टोला भाजपचे नाशिकचे प्रभारी व माजीमंत्री जयकुमार रावल (Jaykumar Rawal) यांनी लगावला. पक्षात कुठलीच गटबाजी नसून, एकदिलाने सर्व काम करत असल्याचे सांगताना महापालिका निवडणुकीत शंभरपेक्षा अधिक जागा निवडून येतील असा दावा त्यांनी केला.

Jaykumar Rawal (BJP)  & Sanjay Raut (Shivsena)
हिदूत्ववादी भाजपने सुरु केले जातनिहाय मतदारांचे माहिती संकलन

मागील आठवड्यात शिवसेनेचे नेते संजय राऊत (Shivsena leader Sanjay Raut) यांची भाजप नगरसेवक विशाल करंजकर यांनी भेट घेतली. याच सभेत खासदार राऊत यांनी भाजपचे अठरा नगरसेवक संपर्कात असल्याचा दावा केला होता. त्याला उत्तर देताना श्री. रावल यांनी भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, राष्ट्रीय पक्ष असलेल्या भाजपने संसदेत दोनवरून चारशेपर्यंत मजल मारली. मतदार भाजपवर निष्ठा असणाऱ्यांना मतदान करते. नाशिककरांची निष्ठा भाजपवरच आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत महापालिकेत शंभरहून अधिक उमेदवार विजयी होतील. भाजप परिवारवादी पक्ष नसून, लोकशाही मार्गाने चालणारा पक्ष आहे. ठराविक नेत्यांनी चालविलेला भाजप हा पक्ष नसून, कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जातात. पक्षात कुठेही गटातटाचे राजकारण नाही. सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी एकोप्याने काम करत आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीत नाशिक महापालिकेत पुन्हा भाजपचीच सत्ता येईल. त्याचबरोबर मुंबई, ठाणे, कल्याण आदी महापालिकांमध्येदेखील भाजप सत्ता स्थापन करून प्रस्थापितांना जागा दाखविल्या शिवाय राहणार नाही.

Jaykumar Rawal (BJP)  & Sanjay Raut (Shivsena)
आमदार संजय सावकारेंनी महावितरणच्या अधिकाऱ्यांचे कान टोचले!

घोडा-मैदान जवळ

खासदार राऊत यांच्या दाव्याचा संदर्भ देताना श्री. रावल म्हणाले, कोणकोणत्या पक्षात जाणार यावर चर्चा करण्यापेक्षा घोडा- मैदान जवळ आहे. त्यावेळी कोण व किती कुठल्या पक्षात गेले हे विरोधकांना नक्कीच समजेल. त्यामुळे पक्षांतर हा विषय भाजपसाठी फारसा चिंतेचा नाही. भाजपचे मतदार एकनिष्ठ असतात व ते भाजपलाच मतदान करतात हा विषय जास्त महत्त्वपूर्ण आहे.

इतर पक्षातील अनेक नेत्यांना भाजपची विचारसरणी पटली असून ते भाजपच्या वाटेवर आहेत. ते पक्ष प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. यासंदर्भात योग्यवेळी, योग्य निर्णय भाजपच्या वाटेवर असलेल्या नेत्यांबाबत घेतला जाईल.

- जयकुमार रावल, नाशिक शहर भाजप प्रभारी.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com