Chhagan Bhujbal News: बीडमध्येच लक्ष घाला; भुजबळांचा पंकजाताईंना सल्ला

Nashik Constituency 2024: नाशिकमध्ये आमच्याकडे उमेदवार नाहीत असे नाही. खूप उमेदवार आहेत. पंकजा मुंडे यांनी स्वतः निवडून येणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे बीडमध्येच लक्ष घातलेलं चांगलं राहील.
Chhagan Bhujbal News
Chhagan Bhujbal NewsSarkarnama

Nashik Constituency Lok Sabha 2024: नाशिक लोकसभा मतदारसंघातून अद्याप महायुतीचा उमेदवार जाहीर झालेला नाही. मंत्री छगन भुजबळ आणि खासदार हेमंत गोडसे हे येथील इच्छुक उमेदवार आहेत. या पार्श्वभूमीवर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केलेल्या विधानाचा मंत्री भुजबळ यांनी समाचार घेतला.

बीड येथे उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पंकजा मुंडे यांनी खासदार प्रीतम मुंडे यांचे पुनर्वसन करण्यात येईल. त्यांना नाशिकमधून उमेदवारी देऊ, असे विधान केले होते. त्याच्या प्रतिक्रिया राजकीय क्षेत्रात उमटल्या आहेत. नाशिकमधील इच्छुक उमेदवारांनीदेखील याबाबत खरोखरच मुंडे यांना उमेदवारी मिळेल काय? यावर चर्चा सुरू केली आहे.

या पार्श्वभूमीवर आज राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या विधानाचा समाचार घेतला आहे. ते म्हणाले, पंकजाताई मुंडे यांनी आपल्या स्वतःच्या निवडणुकीतच लक्ष घालावे. नाशिकमध्ये आमच्याकडे उमेदवार नाहीत असे नाही. खूप उमेदवार आहेत. पंकजा मुंडे यांनी स्वतः निवडून येणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे बीडमध्येच लक्ष घातलेलं चांगलं राहील असे ते म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भुजबळ यांनी आपण नाशिक सोडून जाणार नाही, असे स्पष्ट केले. त्यामुळे नाशिक मतदारसंघातील उमेदवार म्हणून भुजबळ अद्यापही स्पर्धेत आहेत हे स्पष्ट होते. या संदर्भात ते म्हणाले, माझे नाव नाशिक मतदारसंघासाठी निश्चित झाले होते. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला फोन केला.

तुम्ही शिरूर मतदारसंघातून निवडणूक लढवू इच्छिता का? शिरूर मतदारसंघातदेखील मोठ्या प्रमाणावर ओबीसी बांधव आहेत. त्यामुळे ते तसे म्हणाले असावे. मात्र तसे झाले असते तर, नाशिक मतदारसंघ शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटासाठी मोकळा झाला असता. त्यामुळे मी त्याला नकार दिला. मी नाशिक मतदारसंघ सोडून अन्यत्र जाणार नाही, हे माझे स्पष्ट मत आहे.

Chhagan Bhujbal News
Nana Patole News: नानाभाऊ, व्हेटिंलेटर तर काढलेच नाही....

यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न मिळावा या संदर्भात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या घोषणा पत्रात उल्लेख केला आहे. त्यावर उपमुख्यमंत्री पवार यांच्यावर अनेकांनी टीका केली आहे.

त्याचा बचाव भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केला. ते म्हणाले, आपल्या घोषणा पत्रात राजकीय पक्षाने काय उल्लेख करावा, याबाबत काही कायदा आहे का? राजकीय पक्ष आपल्या घोषणा पत्रात त्यांना योग्य वाटणारे कोणतेही विषय समाविष्ट करू शकतात.

Edited by: Mangesh Mahale

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com