Maratha Reservation : ''मनोज जरांगेंच्या जिवाचे बरेवाईट झाल्यास...'' ; नगर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळेंचा इशारा

Maratha Agitation : मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवरायांच्या नावाने दसरा मेळाव्यात घेतलेली शपथ २४ तासांच्या आत खरी करून दाखवावी, असं आश्वासनही दिलं आहे.
Negar Maratha Agitation
Negar Maratha Agitation Sarkarnama
Published on
Updated on

प्रदीप पेंढारे -

Negar Maratha Agitation :''राज्य सरकार अजूनही मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये घोषणा करायला तयार नाही. मनोज जरांगे पाटील यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत चालली आहे. त्यांच्या जिवाचं काही बरं वाईट झालं, तर त्याची सर्व जबाबदारी सरकारवर असणार आहे.'' असं विधान नगर शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केलं आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Negar Maratha Agitation
Curfew in Beed : बीडमध्ये 'SRPF' तुकड्या दाखल; जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षकांसह अधिकारी उतरले रस्त्यावर!

मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवरायांच्या नावाने दसरा मेळाव्यात घेतलेली शपथ २४ तासांच्या आत टिकणारे आरक्षण जाहीर करून तसेच ती खरी करून दाखवावी, असे आवाहन नगर शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केले आहे. छत्रपती शिवरायांची खोटी शपथ घेतली, तर महाराष्ट्र कदापि मुख्यमंत्र्यांना माफ करणार नाही, असंही या वेळी जिल्हाध्यक्ष काळे म्हणाले.

सकल मराठा समाजाच्या वतीने नगर तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये सुरू असणाऱ्या साखळी उपोषणाला काळे यांनी भेट देत शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने पाठिंबा जाहीर केला. या वेळी ते बोलत होते. या वेळी काळे यांच्यासह ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा, दशरथ शिंदे, अल्पसंख्याक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष अनिस चुडीवाला, शहर जिल्हा उपाध्यक्ष अल्तमश जरीवाला, इंजिनियर सुजित क्षेत्र उपस्थित होते.

जिल्हाध्यक्ष काळे म्हणाले, "मराठा समाजाच्या भावना तीव्र आहेत. संयमाची विनाकारण सरकार परीक्षा पाहत आहे. जरांगे पाटलांच्या मागणीची पूर्तता झाली नाही, तर राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होईल. सरकारने विनाकारण मराठा बांधवांच्या संयमाला उद्रेकाचे स्वरूप मिळेल, अशा प्रकारचे कृत्य करू नये".

Negar Maratha Agitation
Maratha Reservation News : जामखेड, श्रीगोंदा मंगळवारी 'बंद'ची हाक; तर पाथर्डीत सदावर्तेंचा पुतळा जाळला

राज्य व केंद्रात एकाच पक्षाचे सरकार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी राज्य विधिमंडळाचे तातडीचे अधिवेशन बोलवावे. मुख्यमंत्र्यांनी सर्व मंत्र्यांसह राज्यातील सर्वपक्षीय आमदार, सर्वपक्षीय खासदार यांना घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊन संसदेचे तातडीचे विशेष अधिवेशन बोलावून यामध्ये तत्काळ मराठा आरक्षणाचा विषय मंजूर करण्यासाठी दिल्ली गाठत मराठा समाजाला टिकेल असे जरांगेंच्या मागणीप्रमाणे आरक्षण द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com