निसर्गाने भरभरून पाऊस दिला...व्यवस्था मात्र कर्मदरिद्री...

त्र्यंबकेश्‍वर तालुक्यात वाहणाऱ्या पश्‍चिम वाहिनी वाघ नदीचे पाणी मोठ्या प्रमाणावर गुजरातमध्ये वाहून जाते.
Wagh river Of Trimbakeshwar
Wagh river Of TrimbakeshwarSarkarnama

डॉ. राहुल रनाळकर

नाशिक : गेले ८-९ दिवस समाधानकारक पाऊस (Rain) झाल्याने जुलैमध्येच प्रमुख धरणे भरणार आहेत. धरणे भरली म्हणजे आपली इतिकर्तव्यता पार पडली, असा शासकीय (Government) यंत्रणांसह सगळ्यांचा अर्विभाव असतो. मात्र निसर्ग भरभरून देत असताना याच भागात उन्हाळ्यात महिलांच्या डोक्यावर हंडे असतात. (Water scarcity in the same rainy areas) त्यांना वणवण भटकावे लागते. हे चित्र केव्हा व कोण दूर करणार?. (Dams and rivers are overflow due to Heavy rainfall & lot of water flows to Gujrat)

Wagh river Of Trimbakeshwar
दादा भुसे यांनी उद्धव ठाकरेंपुढे अन्नाची शपथ घेतली, अन् गद्दारी केली..

धरणांची आकडेवारी दररोज समोर येत राहते. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न त्याखालोखाल शेतीचा अन् औद्योगिक पाणीवापराचा प्रश्न किमान वर्षभरासाठी मार्गी लागला, हेच काय ते समाधान पाटबंधारे खाते आणि अन्य सरकारी अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसून येतं. पण बारकाईनं विचार केला, तर या सगळ्या परिस्थितीमध्ये व्यक्ती, सरकारी यंत्रणा म्हणून आपलं योगदान काडीमात्रही नाही, हे समजून घ्यायला हवं. निसर्गानं भरभरून आपल्याला दिलंय. उलट आपली ओंजळ ते सामावून घ्यायला कमी पडतेय, ही भयावह वस्तुस्थिती मान्य करायला हवी. निसर्गाची कृपा झाली, अन्यथा आणखी ८-१० दिवस पाऊस लांबला असता तर पिण्याची पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ लोकांवर आली असती.

Wagh river Of Trimbakeshwar
आमदार भुयारांनी खासदार राऊतांना दिली लग्नाची पत्रिका, राजकीय चर्चा नाही…

वास्तविक कोरोनामुळे जंगलांची स्थिती काही प्रमाणात का होईना नैसर्गिकरित्या सुधारली. प्रदूषण कमी झाल्यामुळे हवेची गुणवत्ता वाढली. पर्यायानं पावसाची सरासरी चांगली आहे. अगदी अल्पावधीत धरणं भरताहेत, ही जमेची बाजू म्हणायला हवी. नाशिकमधल्या जोरदार पावसामुळे जायकवाडीला फायदा होत आहे. गिरणा धरण सलग दुसऱ्या-तिसऱ्या वर्षी पूर्ण भरण्याच्या मार्गावर आहे. हवामान अभ्यासकांच्या मते मात्र पावसाचा पॅटर्न मोठ्या प्रमाणात बदलत आहे. पूर्ण पावसाळ्यात पाऊस पूर्वी पडायचा आता अवघ्या काही दिवसांत तो धडधड पडून जातो. पॅटर्न जर बदलत असेल तर आपल्या पाणी साठवणीच्या बुरसटलेल्या यंत्रणाही बदलायला हव्यात. जिथे पाऊस पडतोय, तिथून पाणी आवश्यकतेनुसार गरजेच्या ठिकाणी नेण्यासाठी पाइपलाइन उभारणी करण्याचं काम सुरू करायला हवं. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘हर खेत में पानी’ ही योजना जाहीर केली आहे. प्रत्येक शेतात पाइपद्वारे पाणी पोचविण्याचं त्यांचं स्वप्न आहे. या योजनेमुळे पाण्याची बचत तर होईलच, पण पाणी प्रत्येक शेतकऱ्याला देखील मिळेल. मात्र महाराष्ट्र या योजनेपासून कोसो मैल दूर आहे.

नारपार योजनेच्या गप्पा सुरू होऊन अनेक वर्षे लोटली आहेत. गुजरातला वाहून जाणारं पाणी रोखायचं, हा चर्चेचा मोठा मुद्दा ठरतो. प्रत्यक्षात तापी खोऱ्यातून नैसर्गिकरित्या गुजरातला जाणारं पाणी रोखणं केवळ अशक्य आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणेवेळी अय्यंगार समितीनं ठरवून दिल्यानुसार ४०० टीएमसीपैकी आजही अधिकांश पाणी गुजरातला मिळतं. महाराष्ट्राच्या वाट्याचं १९१.४० टीएमसी पाण्याच्या कोट्यापैकी ९० टीएमसी पाणी आपण वापरू शकलेलो आहोत. मध्य प्रदेशच्या वाट्याचे ७० टीएमसी पाणी आदिवासी भाग आणि जंगल परिसर असल्यानं ते वापरू शकत नाहीत. त्यामुळे नैसर्गिकरित्या २७२ टीएमसी पाणी गुजरातला जात आहे. जळगाव जिल्ह्यातील पाडळसरे प्रकल्प आत्तापर्यंत कार्यान्वित झाला असता, तर अतिरिक्त मिळणारे पाणी उचलून गिरणा खोऱ्यातही वापरता आले असते; पण सध्यातरी ते केवळ एक स्वप्न आहे.

धरणांमधून वितरणाचं जाळे पुन्हा नव्यानं प्रस्थापित करावं लागणार आहे. या संदर्भात गिरणा धरणाच्या पाण्याबाबतचं ताजं उदाहरण डोळ्यांत अंजन घालणारं आहे. जळगाव जिल्ह्यातील बोरी, अंजनी, भोकरबारी, म्हसवे या धरणांतील साठा अजूनही अल्प आहे. गिरणेतून वाहून जाणारे पाणी कॅनालद्वारे या धरणांमध्ये सोडलं असतं तर पाणीसाठा किमान २० ते २५ टक्क्यांनी वाढला असता.

लोकप्रतिनिधींनी जेव्हा संबंधित कर्मचाऱ्यांना असं का केलं नाही, हे विचारलं, तेव्हा आम्हाला लक्ष ठेवावं लागेल म्हणून केलं नाही, असं उत्तर या कर्मचाऱ्यांनी दिलं. या प्रसंगाला शोकांतिका म्हणावं की अजून काही म्हणावं, हे समजेनासं आहे. जळगाव जिल्ह्यात गिरणा नदीची लांबी सुमारे १८० किलोमीटर आहे. ७ ते ८ टीएमसी पाणी दर वर्षी गिरणेतून वाहून जातं. वरखेड-लोंढे सोडलं तर एवढ्या मोठ्या परिसरात केटीवेअर, बलून बंधारे काहीही नाही. बलून बंधाऱ्यांच्या तर केवळ घोषणाच गेली कित्येक वर्षे होत आहेत. आतातरी या घोषणांमधून बाहेर पडून प्रत्यक्ष पाण्याच्या विषयावर गांभीर्यानं काम झाल्यास पुढच्या हवामान बदलाच्या संकंटांना आपण सक्षमतेनं तोंड देऊ शकू, अन्यथा पहिले पाढे पंचावन्न अशीच स्थिती राहील.

-----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com