Nilesh Lanke Politics: निलेश लंके यांची विश्रामगड स्वच्छता मोहीम, राष्ट्रवादीचे नेते करणार शाळेच्या खोलीत मुक्काम?

Nilesh Lanke; MP Nilesh Lanka will conduct a cleanliness drive at Vishramgad. MPs and NCP leaders will perform cleaning -खासदार राजाभाऊ वाजे, भास्करराव भगरे, भाऊसहेब वाकचौरे या तिन्ही खासदारांचा विश्रामगड स्वच्छता मोहिमेत सक्रिय सहभाग
Vishram Gad Fort & Nilesh Lanke
Vishram Gad Fort & Nilesh LankeSarkarnama
Published on
Updated on

Nilesh Lanke News: खासदार निलेश लंके यांनी मावळा संघटनेच्या माध्यमातून गडकोट स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत आता नगरचा विश्रामगड समाविष्ट झाला आहे. लोकसहभागातून मिळणारा प्रतिसाद मोहिमेच्या चर्चेचा विषय आहे.

खासदार निलेश लंके यांनी नाशिकच्या रामशेज गडानंतर अकोले (नगर) येथील विश्रामगडाची स्वच्छता करण्याचा निर्धार केला आहे. येत्या शनिवारी होणाऱ्या या मोहिमेत परिसरातील पाच हजार ग्रामस्थ आपल्या सहभाग नोंदवणार आहेत. त्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे.

खासदार लंके यांच्या या मोहिमेत माजी मंत्री जयंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे हे देखील सहभागी होणार आहेत. राजाभाऊ वाजे, भास्करराव भगरे आणि भाऊसाहेब वाघचौरे हे चार खासदारही या मोहिमेसाठी सक्रिय झाले आहेत.

Vishram Gad Fort & Nilesh Lanke
Chhagan Bhujbal Politics: मराठा आरक्षण; छगन भुजबळांची एकीकडे सरकारवर नाराजी, दुसरीकडे मात्र मुख्यमंत्र्यांची स्तुती!

यानिमित्ताने खासदार लंके एक दिवस आधीच गडाच्या पायथ्याशी असलेल्या ठाणगाव (सिन्नर) येथे मुक्कामाला येणार आहेत. सहभागी होणारे सर्वच कार्यकर्ते जिल्हा परिषदेच्या शाळेत मुक्काम करीत असतात. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांमध्ये तो चर्चेचा विषय आहे. या मोहिमेला दिवसेंदिवस राजकीय कार्यकर्त्यांचा वाढता सहभाग असल्याने ही मोहीम चर्चेत आहे.

खासदार लंके यांच्या पुढाकाराने मावळ संघटनेतर्फे गेले काही महिने ही मोहीम सुरू आहे. नाशिकच्या रामशेज किल्ल्यासह शिवनेरी, धर्मवीरगड, रायरेश्वर, तिकोना, प्रतापगड या किल्ल्यांवर आजवर स्वच्छता मोही राबविण्यात आली आहे. गडकोट स्वच्छता मोहीम ही लोक चळवळ करण्याचा मनोदय खासदार लंके यांनी व्यक्त केला आहे.

विश्राम गडाचा इतिहास...

नाशिक आणि नगर जिल्ह्याच्या सीमेवर अकोले येथे विश्रामगड आहे. गडाच्या पायथ्याशी ठाणगाव (सिन्नर) हे गाव आहे. मोरोपंत पिंगळे यांनी 1671 मध्ये मुघलांकडून हा किल्ला ताब्यात घेतला. छत्रपती शिवाजी महाराज जालन्याची मोहीम केल्यानंतर या किल्ल्यावर विश्रांतीसाठी आले होते. मोहिमांच्या धावपळीत पंधरा दिवस विश्रांती केल्यानंतर महाराज पुढे रवाना झाले. त्यामुळे या किल्ल्याला विश्रामगड असे म्हटले जाते.

-------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com