Pahalgam Terror Attack: नाशिकमध्ये विवाह केला तरीही "त्या" महिला पाकिस्तानीच, देश सोडण्याची टांगती तलवार?

Pakistan origin womens; Those women who got married in India will get relief? Petition to Government-पाकिस्तानच्या सहा महिला गेली २५ वर्ष नाशिकच्या विवाह करून नाशिकमध्ये वास्तव्यास, आता देश सोडण्याची टांगती तलवार
Pakistan-Origin-Women.jpg
Pakistan-Origin-Women.jpgSarkarnama
Published on
Updated on

Pakistan Origin womens: पहेलगाम येथे पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला. त्याच्या तीव्र प्रतिक्रिया देशभर उमटले आहेत. त्याची प्रतिक्रीया म्हणून केंद्र शासनाने पाकिस्तानी नागरिकांना ४८ तासांत भारत सोडण्याचा आदेश दिला आहे.

केंद्र शासनाच्या आदेशामुळे ४८ तासात पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याच्या सूचना आहेत. प्रत्यक्षात असा आदेश व्यक्तिशः कोणालाही प्राप्त झालेला नाही. त्यामुळे याबाबतचा निर्णय जाहीर केल्यानंतरही पाकिस्तानी नागरिकांना परत पाठविण्याची प्रक्रिया सुरू झालेली नाही, असे सूत्रांनी सांगितले.

Pakistan-Origin-Women.jpg
Vivek Kolhe : विवेक कोल्हेंना लवकरच खुशखबर मिळणार; मुख्यमंत्र्यांचा हवाला देत चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठं विधान

पाकिस्तानातील सहा महिलांचा आप्तस्वकीयांच्या संपर्कातून नाशिकच्या नागरिकांची विवाह करून रहात आहेत. वीस वर्षाहून अधिक त्यांचे वास्तव्य आहे. त्यांना मुलेही झालेली आहेत. या महिलांपुढे पहेलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे केंद्र शासनाने काढलेल्या निर्णयाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

Pakistan-Origin-Women.jpg
Malegaon ED Raids : मालेगावात एकही बांग्लादेशी सापडला नाही, अपयश लपविण्यासाठी ईडीचे छापे : माजी आमदार आसिफ शेख यांचा दावा

यासंदर्भात संबंधित महिलांना अद्याप देश सोडण्याबाबत कोणतीही नोटीस बजावण्यात आलेली नाही, असे पोलिसांनी सांगितले. या महिलांकडे दीर्घकाळ वास्तव्य करण्याचा परवाना आहे. दरवर्षी नियमानुसार त्याचे नूतनीकरण करून मुदतवाढ दिली जाते.

प्रचलित कायदे आणि परराष्ट्र मंत्रालयाच्या संहिता यानुसार एखाद्या परदेशी महिलेने भारतीय नागरिकाशी विवाह केला तरीही तिचे नागरिकत्व संबंधित देशातीलच मानले जाते. सहा महिला देखील अद्यापही पाकिस्तानी नागरिकच आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होऊ शकते, असे कायदेतज्ञांचे मत आहे.

मात्र या महिलांनी यापूर्वी आपला भारतात रहिवासाचा कालावधी वाढविण्यासाठी वेळोवेळी पोलिसांच्या माध्यमातून अर्ज केला आहे. यापूर्वी त्यांना मुदतवाढ देखील मिळालेली आहे. त्यामुळे या महिलांचा वेगळा विचार केला जाऊ शकतो. त्यातून सरकार त्यांना वास्तव्याचा कालावधी वाढवून देऊन दिलासा देऊ शकते. त्यामुळे या सहा पाकिस्तानी महिलांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com