Maratha Reservation Issue: प्रकाश आंबेडकर म्हणाले, मराठा आरक्षणाचा निर्णय बेकायदा, भाजपने मारले एका दगडात अनेक पक्षी!

Prakash Ambedkar on Maratha reservation: मराठा आणि ओबीसी आरक्षण एकत्र नको, प्रत्येकाचे ताट स्वतंत्र हवे, अन्यथा असंतोष निर्माण होईल.
Prakash Ambedkar's view on Maratha quota
Prakash Ambedkar's view on Maratha quotaSarkarnama
Published on
Updated on

BJP's Strategy on Maratha Quota: मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून बेमुदत उपोषण केले. त्यानंतर राज्य सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेतला. त्यावरून जोरदार राजकारण सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधक दोघेही आक्रमक आहेत.

मराठा आरक्षणाच्या विषयात सुरुवातीपासून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी विरोधाची भूमिका घेतली. याबाबत ते अद्यापही ठाम आहेत. मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवताना मराठा आणि ओबीसी यांचे आरक्षणाचे ताट स्वतंत्रच असले पाहिजे, असे ते म्हणाले.

महाराष्ट्र शासनाच्या मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जरांगे पाटील यांच्या पाच मागण्या मान्य केल्या. यामध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्याचा मार्ग मोकळा झाला. संदर्भात घेतलेल्या निर्णय कायद्याला धरून नाही, असा आक्षेप प्रकाश आंबेडकर यांनी घेतला आहे.

Prakash Ambedkar's view on Maratha quota
Uddhav Thackrey Politics: मुंबईच्या दसरा मेळाव्याआधीच उद्धव आणि राज ठाकरेंचे नाशिकमध्ये होणार मोठे शक्तीप्रदर्शन, हे आहे मिशन!

मराठा आरक्षणाच्या निमित्ताने सत्ताधारी आणि विरोधक दोघेही राजकीय भूमिकेतून टीका आणि समर्थन करीत आहेत. मात्र हा विषय राजकीय कमी आणि सामाजिक अधिक आहे. त्यामुळे राज्य सरकारने हा निर्णय घेताना सामाजिक समतोल व न्याय विचारात घ्यायला हवा होता.

मराठा आरक्षण आंदोलनातील हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय शासनाने घेतला. नुसार कुणबी जातीचे दाखले देण्याचे काम देखील सुरू झाले आहे. या विरोधात प्रचंड रोष आहे, असा दावा आंबेडकर यांनी केला.

राज्य शासनाच्या या निर्णयाला आपल्या ठाम विरोध असल्याचे ॲड आंबेडकर म्हणाले. सरकारमध्ये सत्तेत असलेल्या मराठा नेत्यांना गरीब मराठा आणि ओबीसी यांच्यात भांडण लावायचे आहे. त्यांनी आपला हेतू साध्य करण्यासाठी पडद्यामागून सूत्र हलवली.

सर्वच राजकीय पक्षांमध्ये निजामी वृत्ती आहे. या निजामी वृत्तीचे आमदार आणि खासदार समाजात भांडण लावण्याची कोणतीही संधी सोडत नाही. या निर्णयानंतर ओबीसी समाज देखील रस्त्यावर उतरला आहे. त्यामुळे भाजपने या निर्णयाच्या माध्यमातून एका दगडात अनेक पक्षी मारले आहेत, अशी टीका आंबेडकर यांनी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com