Nagar Lok Sabha 2024 : 'संविधाना'च्या नावाखाली विरोधक आपली पोळी भाजत आहेत; विखे बरसले

Radhakraishna Vikhe Patil : भाजपने 'अब की बार चारसौ पार'ची घोषणा दिली आहे. या घोषणेवर इंडिया आघाडीकडून जोरदार हल्ला चढवत भाजपला 'चारसौ पार' संविधान बदलण्यासाठी हवे आहे, असा आरोप केला आहे
Radhakraishna Vikhe Patil
Radhakraishna Vikhe PatilSarkarnama

Nagar Loksabha Constituency : भाजप नेते नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे Radhakrishna Vikhe विरोधकांच्या संविधान बदलाच्या आरोपावर चांगले बरसले. "विरोधकांकडे मुद्दाच नाही. त्यामुळे संविधान बदलाची भाषा करून, विरोधक आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहे", असा टोला मंत्री विखे यांनी लगावला.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या RPI पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या आयोजित बैठकीत मंत्री विखे बोलत होते. 'आरपीआय'चे संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव, जिल्हाध्यक्ष संजय भैमुले, महिला जिल्हाध्यक्ष जया गायकवाड, युवक जिल्हाध्यक्ष अमित काळे उपस्थित होते.

देशात लोकसभा निवडणुकीचे Loksabha Election वातावरण चांगलेच पेटले आहे. भाजपने 'अब की बार चारसौ पार'ची घोषणा दिली आहे. या घोषणेवर इंडिया आघाडीकडून जोरदार हल्ला चढवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 'चारसौ पार' संविधान बदलण्यासाठी हवे आहेत. संविधानाला धक्का लावण्यासाठी 'चारसौ पार'चा नारा दिला जात आहे, असा आरोप इंडिया आघाडीकडून दिला जात आहे. महायुती आणि इंडिया आघाडी यांच्यात या मुद्यावरून चांगला राजकीय वॉर सुरू आहे.

Radhakraishna Vikhe Patil
Dindori constituency 2024 : राष्ट्रवादीचा सडेतोड प्रश्न, 'अहो, भारतीताई पाच वर्षांत कांदा प्रश्नावर काय केले'..?

भाजप नेते मंत्री राधाकृष्ण विखे Radhakrishna Vikhe यांनी विरोधकांचा आरोपांवर चांगलीच टोलेबाजी केली आहे. मंत्री विखे म्हणाले, "देशामध्‍ये संविधान दिन साजरा करण्‍याचा निर्णय करुन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक प्रकारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा गौरव केला. विरोधकांकडे आज कोणतेही मुद्दे राहिले नाहीत. त्‍यामुळेच संविधान बदलाची भाषा करुन, दिशाभूल करण्‍याचा प्रयत्न सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी Narendra Modi यांच्या झंझावातासमोर विरोधकांचे अस्तित्व धोक्‍यात आले आहे".

पंतप्रधान मोदी यांच्‍या नेतृत्‍वाखाली मागील दहा वर्षात झालेल्‍या योजनारुपी कामांमुळेच देशातील सर्व समाज घटक एकत्रित आला आहे. रिपाईचे अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्‍वाखाली देशपातळीवर काम करण्‍याची संधी दिली. त्‍यांच्‍या मार्गदर्शनाखाली सामाजिक न्‍याय व आधिकारीता मंत्रालयाच्‍या माध्‍यमातून राष्‍ट्रीय वयोश्री योजना यशस्‍वीपणे राबविली गेली. नगर जिल्‍हा या योजनेत अग्रस्‍थानी राहिला असल्याची आठवण मंत्री विखे यांनी यावेळी करून दिली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काँग्रेसने आंबेडकरांवर अन्यायच केला

काँग्रेस पक्षाने नेहमीच भारतरत्‍न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांवर अन्‍याय केला. आंबेडकरांच्‍या विचाराप्रमाणे सामाजिक न्‍यायाची प्रक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी Narendra Modi यांनी गेल्या दहा वर्षात संपूर्ण देशात राबविली आहे. संविधानाचा सन्‍मान म्‍हणून देशात संविधान दिन साजरा करण्याचा निर्णय त्‍यांनी घेतला. तरीही विरोधक जाणीवपूर्वक संविधान धोक्‍यात आल्‍याची टिका करत आहेत.

अत्‍यंत निरर्थक असल्याचे मंत्री विखे Radhakraishna Vikhe Patil यांनी सांगितले. राज्‍य सरकारने इं‍दू मिल येथील जागेवर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे स्‍मारक उभारण्‍याचा निर्णय घेतला आहे. लंडन येथील त्‍यांच्‍या निवासस्‍थानालाही स्मारकाचा दर्जा दिला आहे. महाविकास आघाडीला हे कधीही सुचले नाही. केवळ सामाजिक द्वेष निर्माण करण्‍याचा प्रयत्‍न केल्याची टीका मंत्री विखे यांनी केली आहे.

Radhakraishna Vikhe Patil
Chhagan Bhujbal News : 'शिरूरच्या जागेसाठी मुख्यमंत्र्यांचा फोन...', अमोल कोल्हेंच्या दाव्यावर छगन भुजबळांचे प्रत्युत्तर

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com