Raju Shetti: 'विरोधी पक्षांतील प्रत्येकाची सत्तेत जाण्यासाठी स्पर्धा...'; राजू शेट्टींनी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडेच बोट दाखवलं

Raju Shetti On Mahayuti Politics : महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा सत्ताधारी महायुतीमध्ये घाऊक प्रवेश होत आहेत. विविध नेते आणि त्यांचे प्रवेश हा वादाचा आणि राजकीय विचार रसातळाला नेणारा असल्याची जहरी टीकाही त्यांनी यावेळी केली.
Raju Shetti
Raju ShettiSarkarnama
Published on
Updated on

Nashik News : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात जोरदारपणे पक्षांतराचे वारे वाहू लागले आहेत. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुतीकडून विरोधी पक्षातील काठावरच्या नेत्यांना आपल्या पक्षात खेचून आणण्यासाठी गळ टाकले जात आहेत. सध्या महाविकास आघाडीतील नेत्यांचीही सत्तेत जाण्यासाठी आटापिटा सुरू आहे. यावरुनच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी आघाडीच्या पक्षप्रवेशासाठी इच्छुक नेत्यांना चांगलंच फटकारलं आहे.

महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा सत्ताधारी महायुतीमध्ये घाऊक प्रवेश होत आहेत. विविध नेते आणि त्यांचे प्रवेश हा वादाचा आणि राजकीय विचार रसातळाला नेणारा असल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली आहे.

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यात रोज आरोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. त्यावर राजू शेट्टी यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. भारतीय जनता पक्ष आणि सत्ताधारी पक्ष ज्या पद्धतीने विरोधकांना हिणवतो हा चिंतेचा विषय आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण रसा तळाला गेले आहे.

यापूर्वी देखील पक्षांतर होत होते. मात्र त्यात वैचारिक भूमिका आणि मतभेद किंवा सहमती असायची. भूमिका घेऊन लोक अन्य पक्षात जात असत. उद्या मात्र भूमिका घेतली तर त्याला भीती दाखवून आपल्या पक्षात घेण्याची सत्ताधाऱ्यांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. याबाबत जनतेत संताप आहे पण तो व्यक्त होताना दिसत नाही. काहीतरी ही यादवी व्यक्त होईल, असा इशारा त्यांनी दिला.

Raju Shetti
BJP News: लोकसभेला फटका,'संविधान' 'नॅरेटिव्ह'चा भाजपला अजूनही धसका; पलटवारसाठी आखली नवी रणनीती

विरोधी पक्षात प्रत्येकाला सत्तेत जाण्याची स्पर्धा लागली आहे. त्यामध्ये विचार संपुष्टात आल्याचे जाणवते. माझी महाराष्ट्रातील नेत्यांना विनंती आहे की काय करायचे ते करा. फक्त महाराष्ट्राचे वाटोळे करू नका अशा संत शब्दात शेट्टी व्यक्त झाले.

सत्ताधारी पक्षात आपल्या व्यक्तिगत राजकीय असूयेतून मोठा विरोधाभास निर्माण होऊ लागला आहे. त्याचा राज्यातील शेतकऱ्यांना फटका बसतो आहे. कृषी खाते दुर्लक्षित झाले आहे. कृषिमंत्री स्वतःच आपल्या विभागाला ओसाड गावची पाटीलकी म्हणतात, हे दुर्दैव आहे. त्याला अर्थमंत्री अजित पवार जबाबदार नाहीत का?. या विरोधाभासातूनच शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com