Gulabrao Patil : पाणी पुरवठामंत्री संतापले ; म्हणाले, "आकाशातून पाणी देवू का...?

Gulabrao Patil : पाणी पुरवठा करणारे पंप गाळात रुतले आहेत, त्यामुळे पाणी पुरवठा होऊ शकत नाही, ही स्थिती असताना नळांना पाणी आकाशातून टाकतील काय," असा सवाल राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला आहे.
Gulabrao Patil
Gulabrao PatilSarkarnama

जळगांव : राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांचं एक विधान गेल्या काही दिवसांपूर्वी गाजलं होतं. मला पाणीवाला बाबा बनायचंय, असे ते म्हणाले होते. मात्र, हे सांगणाऱ्या पाणीपुरवठा मंत्र्यांच्याच तालुक्यात भर हिवाळ्यात तीव्र पाणी टंचाई निर्माण झालीय. (Gulabrao Patil latest news)

पाणी टंचाईमुळं नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. तब्बल तीन ते चार किलोमीटरवर असलेल्या विहिरीवरून पाणी आणण्यासाठी पायपीट करावी लागतेय. तर, विहिरीवर पाण्यासाठी जीव घेणी कसरत करावी लागतेय. शाळकरी विद्यार्थ्यांवर पाणी भरण्याची वेळ आलीय तर शाळा बुडवून काही विद्यार्थांना पाण्यासाठी घरी राहावे लागतेय. यासंदर्भात गुलाबराव पाटील यांना विचारलं असता त्यांनी आकाशातून पाणी देवू का ? असं म्हटलंय.

"पाऊस अधिक झाल्यामुळे नद्यांना पाणी आले आहे, पाणी पुरवठा करणारे पंप गाळात रुतले आहेत, त्यामुळे पाणी पुरवठा होऊ शकत नाही, ही स्थिती असताना नळांना पाणी आकाशातून टाकतील काय," असा सवाल राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला आहे.

पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या धरणगाव मतदार संघात पाण्याची टंचाई आहे, त्यावर ठाकरे गटाच्या शिवसेनेने आंदोलन केले व पाणीपुरवठा मंत्र्यांच्या गावातच पाणी टंचाई, असा आरोप केला, याबाबत पत्रकारांनी प्रश्न केला असता, गुलाबराव पाटील म्हणाले, "नद्यांना पूर आल्याने पाण्याचे पंप हे नदीत आहेत, त्यात गाळ साचल्याने हे पंप बंद आहेत. पंप बंद असल्याने एकट्या धरणगाव नव्हे, तर एरंडोल, जळगाव येथेही दूषित पाणी पुरवठा होत आहे. हे पंप दुरूस्त करण्यासाठी पाणबुडी सुद्धा पाण्यात जाऊ शकत नाही अशी स्थिती आहे, त्यामुळे पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे,"

Gulabrao Patil
Bhaskar Jadhav यांच्या घरावरील हल्ल्यामागे यंत्रणा ? ; आदित्य ठाकरेंचा सरकारला सवाल

"आता नदीत पंपसेट आहे, नदीत विहीर आहे, नदीला पाणी आहे. अशा स्थितीत पाणी काय आकाशातून टाकले जाईल का ? याचा विचार करावा त्यामुळे तांत्रिक बिघाडामुळे पाणी टंचाई निश्चित आहे, मात्र त्याच भांडवल कोणी करू नये," असे गुलाबराव पाटील म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com