Prakash Ambedkar | Uddhav Thackeray
Prakash Ambedkar | Uddhav Thackeray Sarkarnama

"भविष्यात शिवसेनेशी युती होवू शकते"; प्रकाश आंबेडकरांची 'शिवशक्ती-भीमशक्ती'साठी साद

Prakash Ambedkar | VBA | Shivsena | : सगळे फिरवायला तयार आहेत पण, लग्न करायला कोणीही तयार नाही

अकोला : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी राज्यात पुन्हा एकदा 'शिवशक्ती-भीमशक्ती' समीकरणासाठी शिवसेनेला (Shivsena) साद घातली आहे. अकोला येथे झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी सिल्वर ओकवरील हल्ला, राज ठाकरेंचे उत्तर सभेतील भाषण, राज्यातील वीज प्रश्न अशा विविध मुद्द्यावर भाष्य केले. यावेळी त्यांनी काँग्रेस असो की शिवसेना, युतीसाठी आमचे पर्याय खुले आहेत असे म्हणतं आगामी निवडणुकांच्या दृष्टीने भाष्य केले.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, काँग्रेससोबतची (Congress) चर्चा आमची पुढे सरकत नाही. भाजपप्रमाणे शिवसेनेशी आम्ही संबंध तोडलेले नाहीत. त्यामुळे शिवसेनेशी आमची युती होवू शकते, आता याबाबतचा निर्णय शिवसेनेने घ्यायचा आहे. माझी यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासोबत एकदा भेट झाली होती. त्यावेळी त्यांचा युतीसंदर्भाचा विषय काढण्याची हिंमत झाली नाही. मैत्रीसर्वांनाच हवी आहे. मात्र, त्यापुढे जाण्याची कोणाची तयारी नसल्याचे आंबेडकर यांनी स्पष्ट केले. याचे वर्णन करताना ते म्हणाले, सगळे फिरवायला तयार आहेत पण, लग्न करायला कोणीही तयार नाही, असे ते म्हणाले.

Prakash Ambedkar | Uddhav Thackeray
सिल्व्हर ओकवरील हल्ला : गुप्तचर यंत्रणांनी माहिती लपवली, नांगरे पाटलांना निलंबित करा...

राज ठाकरे यांची भूमिका दंगली घडविणारी...

धर्माचा प्रचार, प्रसार करण्याचा अधिकार सर्वांनाच आहे. त्यामुळे मंदिरावर भोंगे लागून हनुमान चालिसा लावल्यास कुणालाही आक्षेप नाही. मात्र, मशिदीपुढे भोंगे लावून हनुमान चालिसा लावणे ही राज ठाकरे यांची भूमिका दंगली घडविणारी आहे. त्यामुळे गृहमंत्र्यांनी त्याची तातडीने दखल घेऊन राज ठाकरे यांच्यावर भादंवि अंतर्गत कारवाई करण्याची मागणी ॲड. आंबेडकर यांनी केली.

Prakash Ambedkar | Uddhav Thackeray
काल छगन भुजबळांवर टीका; आज मुलगा पंकज राज ठाकरेंच्या भेटीला 'शिवतीर्थ'वर!

विजेच्या प्रश्नावरून आघाडी सरकारवर टिका..

सध्या देशातील अनेक राज्यांकडे अतिरिक्त वीज आहे. दुसरीकडे महाराष्ट्र तीन हजार ५४० मेगावॉट वीज तुटवड्यामुळे भारनियमन करीत आहे. वास्तविक नॅशनल ग्रीडमुळे आता कुठल्याही राज्याची वीज क्षणात पोचू शकते. राज्य सरकारने गुजरात, उत्तरप्रदेश, तामिळनाडू, आंध्रप्रदेश अशा अतिरिक्त वीज उपलब्ध असलेल्या राज्यांसोबत निगोशिएशन करून प्रश्‍न तातडीने सोडविण्याची गरज आहे. पण हे तीन पायांचे सरकार असल्याने प्रश्‍न सोडवता येत नाहीत. वीज मंत्र्यांनाच नेमका हा प्रश्‍न किती समजतो, असा प्रश्‍न ॲड. आंबेडकर यांनी उपस्थित केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com