

Nagpur News: वाळू चोरी, महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांवर गाडा चालवणारे लोक भाजपमध्ये कसे, त्यांना कोणी पक्षात प्रवेश दिला, महसूलमंत्र्यांनी त्यांच्या गळ्यात दुपट्टा का घातला असा असे प्रश्न उपस्थित करून भाजपचे आमदार आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांनी आक्रमक पवित्रा घेतला. थेट भाजपच्या नेतृत्वावरच तोफ डागत थेट सत्याग्रहाला बसू असा इशाराही दिला. आशिष देशमुखांच्या या संतापानंतर भाजपनं तातडीनं मोठा यूटर्न घेत दोन नेत्यांच्या पक्षप्रवेशाला स्थगिती दिली. यावरून भाजप नेत्यामधील वाद चव्हाट्यावर आले आहे.
काँग्रेसचे नेते सुनील केदार यांचे कार्यकर्ते नरेंद्र पिंपळे व अमित राय यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे आशिष देशमुख चांगलेच संतापले होते. सावनेर नगरपालिका निवडणूक प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी देशमुखांनी आपली भडास काढली. त्यांनी थेट भाजपचे नेते व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनाच टार्गेट केले. त्यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. यानंतर लगेत दोघांनाही पक्षातून काढून टाकण्यात आल्यची घोषणा जिल्हाध्यक्ष मनोहर कुंभारे यांनी केली.
याची सर्व जबाबदारी त्यांनी आपल्या अंगावर घेतली. पालकमंत्र्यांचा पक्षप्रवेशासाठी कुठलाही संबंध नाही असे सांगून त्यांनी सारवासारवसुद्धा केली. वाळूमाफिया, दमदाटी, दादागिरी, दडपशाहीच्या विरोधात आपण विधानसभेची निवडणूक लढली होती. माजी मंत्री केदारांचा पराभव केला. आता त्यांच्याच समर्थकांना पक्षात आणलं जात असेल तर कोणी खपवून घेणार नाही. लोकांचा भाजपवर विश्वास राहणार नाही, असेही देशमुखांनी सुनावले.
महसूल बुडवणारे लोक महसूल मंत्र्यासोबत दिसतात त्यावेळी आमच्या मनाला वेदना होतात. महसुली अधिकाऱ्यांवर गाड्या चालवणारे लोकांच्या गळ्यात जेव्हा ममहसूलमंत्री भाजपचा (BJP) दुपट्टा घालतात ते आम्हाला सहजासहजी पचणारे नाही. चुकीची कामे करणारे, अवैध धंदे करणारे व्यक्ती, धनी हजारो लाखो रुपयांचा शासनाचा महसूल बुडवला आहे. ज्यांच्यावर अनेक गुन्हेगारीचे गुन्हे दाखल आहे अशा लोकांना कोणी प्रवेश देत असेल,तर ते आम्ही खपवून घेणार नाही, असेही भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी म्हटलं.
ज्यांचे प्रवेश झाले आहे, ते रद्द करण्याचे काम चंद्रशेखर बावनकुळे यांनी करावे अशी विनंती त्यांनी केली होती. तसेच पक्षप्रवेश मागे घेतला नाही तर सत्याग्रहाला बसण्याचा आशिष देशमुख यांनी इशारा दिला होता. यानंतर ते कार्यक्रमातून तडकाफडकी निघून गेल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये खळबळ उडाली होती.
आमदार आशिष देशमुख यांनी रेती माफिया यांना पक्षात घेतल्यामुळे आपली तीव्र नाराजी व्यक्त केली होती. सुनील केदार यांचे कार्यकर्ते नरेंद्र पिंपळे व अमित राय यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला, त्यावरूनच नागपूरचं राजकारण तापलं होतं. त्यांनी जर हा पक्षप्रवेश मागे घेतला नाही तर सत्याग्रहाला बसण्याचा इशाराही पक्षाला देशमुख यांनी दिला होता.
भाजपचे जिल्हाध्यक्ष मनोहर कुंभारे यांनी आमदार आशिष देशमुखांच्या आक्रमक भूमिकेनंतर अमित राय व नरेंद्र पिंगळे यांच्या पक्षप्रवेशाला स्थगिती देण्यात आल्याची घोषणा केली. गैरसमजातून हे पक्षप्रवेश झाल्याचं भाजपचे जिल्हाध्यक्ष मनोहर कुंभारे यांनी सांगितलं. तसेच पक्षप्रवेशाचा हा निर्णय स्थानिक पातळीवर जिल्हाध्यक्ष म्हणून आपण घेतल्याचंही त्यांनी म्हटलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.